शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दोन हजार आशांकडून रॅपिड सर्र्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण तसेच शहरी भागात आशा सेविकांना तातडीच्या रॅपिड सर्वेसाठी नियुक्त केले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण तसेच शहरी भागात आशा सेविकांना तातडीच्या रॅपिड सर्वेसाठी नियुक्त केले असून त्यांच्याकडून घरोघरी किरकोळ आजारपण आणि इतर बांबींचा आढावा घेणे सुरु झाले आहे़ सोमवारपासून गती आलेला हा सर्व्हे दोन दिवसात संपून बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती समोर येणार आहे़जिल्हा आरोग्य विभागाने बाहेरगावाहून आलेल्या स्थलांतरीत नागरिकांमुळे कोरोनाची बाधा होण्याची भिती वर्तवली होती़ यातून ग्रामीण आणि शहरी भागात जलद सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी आशांना नियुक्त करण्याचा निर्णय घेत सोमवारपासून कामकाज सुरु झाले आहे़ यांतर्गत जिल्हाभरात तब्बल १ हजार ८७२ आशा कामाला लागल्या आहेत़ प्रत्येक आशाने किमान १ हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आहेत़ या सर्वेक्षणात कोरोनाचा देशात प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती संकलित करुन घरात कोणाला किरकोळ सर्दी, खोकला, ताप आदी आजारांची लक्षणे असल्यास त्यांची माहिती तातडीने जिल्हा आरोग्य विभागाकडे द्यायची आहे़ तालुका आरोग्य अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत़ दरदिवशी त्यांच्याकडून गटप्रवर्तक आणि आशा यांचा आढावा घेण्यात येत आहे़ एखाद्या घरातून कोरोना सारखी लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्यास त्याला तातडीने जिल्हा रुग्णालय तसेच इतर क्वारंटाईन कक्षात दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ यानुसार शुक्रवारपर्यंत कामकाज सुरु राहणार आहे़ यामुळे येत्या काळात विलगीकरण कक्षांमध्ये सर्दी खोकल्यासारखे आजार असलेल्या काहींना भर्ती करण्याची शक्यता असल्याने सातही क्वारंटाईन कक्ष सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके यांनी दिली आहे़