शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जामियातर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना दिल्या सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ हे सर्व विद्यार्थी परराज्यातील रहिवासी असून लॉकडाऊन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गावी रवाना करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे़ तूर्तास येथे थांबलेल्या या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक संस्थेने स्वखर्चाने तैनात केली आहेत़अक्कलकुवा येथील जामिया संस्थेत मोठ्या संख्येने देश तसेच विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात़ यंदाही सुमारे १२ हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आले होते़ एप्रिल पूर्वी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपणार असल्याने बहुतांश विद्यार्थी मार्चच्या मध्यात घराकडे रवाना झाले होते़ सुमारे सहा हजार विद्यार्थी घराकडे गेले असताना २२ मार्चनंतर लॉकडाऊनचा कालावधी सुरु झाल्याने बहुतांश विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ या विद्यार्थ्यांचे रेल्वे आणि बसचे रिझर्व्हेशन ३ एप्रिल रोजी होते़ परंतू लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी सध्या जामिया वसतीगृहातच अडकून पडले आहेत़ मंगळवारी या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था तसेच जामिया संस्थेतील सोयी सुविधांचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला़ यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे, डॉ़ गयधर, डॉ़ प्रदीप गोयल, डॉ़ स्वप्नील चौधरी, आरोग्य सहायक अभितन पावरा यांच्यासह आरोग्य सहायक व सेवक उपस्थित होते़ त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती संकलित करण्यात आली़ डॉ़ मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती देत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनेटायझर व हँडवॉशचा वापर करण्याच्या सूचना केल्या़ जामिया अहमद गरीब युनानी रुग्णालयाचे संचालक मंडळ व वैद्यकीय अधिकारी भेटीदरम्यान उपस्थित होते़ येथील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत गेल्या १५ दिवसांपासून सूचना करण्यात येत आहे़सद्यस्थितीत मदरशात ६ हजार ४८९ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ हे विद्यार्थी सध्या वसतीगृहात निवासी म्हणून आहेत़ सर्वाधिक ३ हजार ३२४ विद्यार्थी हे बिहार राज्यातील आहेत़ महाराष्ट्र ८४१, आसाम ८८३, पश्चिम बंगाल ३७७, झारखंड ३५०, मध्यप्रदेश १३५, उत्तर प्रदेश १२०, गुजरात ७५, मणिपूर ७२, जम्मू आणि काश्मिर ६४, कर्नाटक ६४, हरीयाणा ५५, राजस्थान ४६ दिल्ली ३६, आंध्रप्रदेश १३, मेघालय १२, ओरिसा ८, हिमाचल प्रदेश ४, तेलंगणा ४, गोवा २ तर पंजाब राज्यातील एक विद्यार्थी येथे थांबून असल्याची माहिती आहे़येथे मुक्कामी असलेल्या सर्व सहा हजार विद्यार्थ्यांचे त्यांच्या गावी परत जाण्यासाठी ३ एप्रिल रोजी रेल्वे आणि बसेसचे आरक्षण होते़ तशी तरतूद त्यांनी आधीच करुन ठेवली होती़ परंतू लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि बस वाहतूक बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना आता येथे थांबावे लागत आहे़ आवारात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार परिसर पूर्णपणे निर्जंतुक करण्यात आला आहे़ तसेच संस्थेने कर्मचारी नियुक्त करुन स्वच्छता कायम ठेवली आहे़ औषध फवारणीसह विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्यावर सॅनेटायझर शिंपडण्यासह इतर अनेक सुविधा दिल्या जात आहेत़ विद्यार्थी एकमेकांपासून लांब राहतील यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने दर दिवशी मास्कचा वापर करण्यासह विविध विषयांवर शिक्षक मार्गदर्शन करत आहेत़