शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

तरूणांच्या सजगतेने खुर्चीमाळ होते प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खुर्चीमाळ येथे गेल्या आठ दिवसापासून वीजपुरवठा खंडित आहे. खुर्चीमाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खुर्चीमाळ येथे गेल्या आठ दिवसापासून वीजपुरवठा खंडित आहे. खुर्चीमाळ येथे दऱ्या खोºयाच्या डोंगराळ भागातून १८ ते २० किलोमीटर अंतरावरील जमाना सबस्टेशनवरून वीज पुरवठा करण्यात येत असून, कायमच कुठे तरी बिघाड होत असतो व बिघाड झाल्यास गावातीलच दोन तरूण जमाना सबस्टेशनला जाऊन सुचीत करीत असतात. तर दुसरे तरूण बिघाड शोधून दुरूस्ती करीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात.जमाना ऐवजी नवलपूरवरून वीज जोडणी झाल्यास दºया खोºयातील चढउताराचे डोंगराळ भागातील १८ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते दोन किलोमीटर अंतरावर येवून कमी अंतरावरील बिघाड लवकर शोधून विजपुरवठा सुरळीत होईल.जमाना सबस्टेशनवर वीज जोडणी असल्याने माळच्या पाड्यांवर बारा महिन्यात वीज कधी आली तर आली नाहीतर मग कायमच गायब असते. माळ, डोगरीपाडा (माळ), माळ (पाटिलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपाडा (माळ) यांना कायम अंधारातच रहावे लागत असून, बिलिगव्हाणपाडा माळ येथे विजेचे पोल, केबलही अद्यापपर्यत टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे या पाड्यांवर कायम अंधाराचे साम्राज्य आहे.एखाद्या वेळेस गर्भवती महिलेला अथवा रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी मोबाईलची गरज पडते. मात्र विजेअभावी मोबाईल चार्ज नसल्याने मोठी अडचण निर्माण होत असते. अतिदुर्गम भाग असल्याने अस्वल, वाघ या सारख्या जंगली प्राण्यांपासून धोका अधिक आहे. त्यामुळे विजेची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.जमाना सबस्टेशनवरून पाटबारा, ओरपा, डाबोसापडा (ओरपापाडा), नेदवान बुद्रूक अशी करीत दºया खोºयातून १८ ते २० किलोमीटर अंतर करीत खुर्चीमाळ, उबराईपाडा (खुर्चीमाळ), हागोबारपाडा (खुर्चीमाळ), कारभारीपाडा (खुर्चीमाळ) मार्गे वीज येत असल्याने विजेच्या बिघाड शोधण्यासाठी अडचणी निर्माण होत असते. त्यामुळे पुढे खुर्चीमाळहून माळ (पाटीलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपडा (माळ) येथेही विजेच्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीतच असतो. बिलिगव्हाणपाडा येथे विजेचे खांब व केबलअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झााले आहे. त्यामुळे जमाना सबस्टेशनऐवजी नवलपूर (अलिविहीर) येथे वीज जोडणी झाल्यास १८ किलोमीटरचे अंतर कमी होवून दोन किलोमीटरवर येईल. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.या पाड्यावरील नाागरीकांना विजेअभावी टीव्ही, पिठाची गिरणी व विजेच्या उपकरणाचा उपयोग करता येत नाही. तसेच येथील नागरीकांना अद्यापपर्यत टीव्ही काय आहे हे माहीत नसल्याची खंत व्यक्त करीत व मोबाईल अक्कलकुवा येथे जावून १० रूपये देवून चार्जीग करून घ्यावा लागतो.