शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांच्या सजगतेने खुर्चीमाळ होते प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खुर्चीमाळ येथे गेल्या आठ दिवसापासून वीजपुरवठा खंडित आहे. खुर्चीमाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खुर्चीमाळ येथे गेल्या आठ दिवसापासून वीजपुरवठा खंडित आहे. खुर्चीमाळ येथे दऱ्या खोºयाच्या डोंगराळ भागातून १८ ते २० किलोमीटर अंतरावरील जमाना सबस्टेशनवरून वीज पुरवठा करण्यात येत असून, कायमच कुठे तरी बिघाड होत असतो व बिघाड झाल्यास गावातीलच दोन तरूण जमाना सबस्टेशनला जाऊन सुचीत करीत असतात. तर दुसरे तरूण बिघाड शोधून दुरूस्ती करीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात.जमाना ऐवजी नवलपूरवरून वीज जोडणी झाल्यास दºया खोºयातील चढउताराचे डोंगराळ भागातील १८ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते दोन किलोमीटर अंतरावर येवून कमी अंतरावरील बिघाड लवकर शोधून विजपुरवठा सुरळीत होईल.जमाना सबस्टेशनवर वीज जोडणी असल्याने माळच्या पाड्यांवर बारा महिन्यात वीज कधी आली तर आली नाहीतर मग कायमच गायब असते. माळ, डोगरीपाडा (माळ), माळ (पाटिलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपाडा (माळ) यांना कायम अंधारातच रहावे लागत असून, बिलिगव्हाणपाडा माळ येथे विजेचे पोल, केबलही अद्यापपर्यत टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे या पाड्यांवर कायम अंधाराचे साम्राज्य आहे.एखाद्या वेळेस गर्भवती महिलेला अथवा रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी मोबाईलची गरज पडते. मात्र विजेअभावी मोबाईल चार्ज नसल्याने मोठी अडचण निर्माण होत असते. अतिदुर्गम भाग असल्याने अस्वल, वाघ या सारख्या जंगली प्राण्यांपासून धोका अधिक आहे. त्यामुळे विजेची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.जमाना सबस्टेशनवरून पाटबारा, ओरपा, डाबोसापडा (ओरपापाडा), नेदवान बुद्रूक अशी करीत दºया खोºयातून १८ ते २० किलोमीटर अंतर करीत खुर्चीमाळ, उबराईपाडा (खुर्चीमाळ), हागोबारपाडा (खुर्चीमाळ), कारभारीपाडा (खुर्चीमाळ) मार्गे वीज येत असल्याने विजेच्या बिघाड शोधण्यासाठी अडचणी निर्माण होत असते. त्यामुळे पुढे खुर्चीमाळहून माळ (पाटीलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपडा (माळ) येथेही विजेच्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीतच असतो. बिलिगव्हाणपाडा येथे विजेचे खांब व केबलअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झााले आहे. त्यामुळे जमाना सबस्टेशनऐवजी नवलपूर (अलिविहीर) येथे वीज जोडणी झाल्यास १८ किलोमीटरचे अंतर कमी होवून दोन किलोमीटरवर येईल. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.या पाड्यावरील नाागरीकांना विजेअभावी टीव्ही, पिठाची गिरणी व विजेच्या उपकरणाचा उपयोग करता येत नाही. तसेच येथील नागरीकांना अद्यापपर्यत टीव्ही काय आहे हे माहीत नसल्याची खंत व्यक्त करीत व मोबाईल अक्कलकुवा येथे जावून १० रूपये देवून चार्जीग करून घ्यावा लागतो.