शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा पर्यटन हब व प्रकाशा, तोरणमाळ विकासाच्या घोषणा हवेतच विरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

नंदुरबार : सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन हब करायचे आणि प्रकाशा तीर्थक्षेत्र व तोरणमाळ पर्यटन केंद्राचा चेहरामोहरा बदलायची घोषणा ...

नंदुरबार : सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन हब करायचे आणि प्रकाशा तीर्थक्षेत्र व तोरणमाळ पर्यटन केंद्राचा चेहरामोहरा बदलायची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पर्यटनमंत्री जयपाल रावल यांनी केली होती. परंतु सरकार बदलले आणि सर्व घोषणाही हवेतच विरल्याची स्थिती आहे. चेतक फेस्टिव्हलला निधीदेखील देण्यास बंद केल्याचे गेल्यावर्षी स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे पुन्हा उपेक्षित राहिली आहेत.

सारंगखेडा येथील पहिल्या चेतक फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी अर्थात चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींचा लवाजमा सारंगखेडा येथे दाखल झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांनी विविध घोषणा केल्या होत्या. त्यामुळे जिल्हावासीयांना पर्यटनस्थळाचा आणि धार्मिक क्षेत्राचा विकास होईल अशी आशा लागली होती. परंतु सतत तीन वर्ष मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावून गेले, कार्यवाही मात्र पुढे सरकली नाही. त्यानंतर गेल्यावर्षी सरकार बदलले आणि चेतक फेस्टिव्हलचा निधी देणे बंद झाले. केलेल्या घोषणाही कागदावरच राहिल्या.

..काय होत्या घोषणा

सारंगखेडा यात्रेत घोडे खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होते. देशभरातील नामवंत घोडे, विविध प्रजातींचे घोडे येथे विक्रीस येतात. ही बाब लक्षात घेता सारंगखेडा येथे अश्व प्रजनन केंद्र व अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करण्यात येणार होता. देशभरातील घोड्यांच्या प्रजातींचे संशोधन व प्रजननसंदर्भात येथे काम होणार होते. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली होती. अश्व प्रजनन केंद्राचे आणि अश्व संग्रहालयाचेे प्राथमिक स्ट्रक्चरदेखील तयार झाले होते. निधी देऊन ते काम सुरू होणार तोच राज्यातील सरकार बदलले आणि हा प्रोजेक्ट फाइलबंद झाला.

याच ठिकाणी तापीवर मोठे बॅरेज आहे. सारंगेखडा ते प्रकाशा या दोन बॅरेजच्या पाण्यामुळे तापी बारमाही भरलेली असते. त्याचा उपयोग करून येथे जलपर्यटनाला वाव देऊन जलक्रीडेचे विविध साहित्य आणण्याचे ठरले. नाशिक येथील गंगापूर धरणात असलेल्या एमटीडीसीच्या बोटी येथे दाखल झाल्या; परंतु यात्रेनंतर त्या एकाजागी बांधून ठेवण्यात आल्या. आता त्या पुन्हा गंगापूर धरणात गेल्या.

सारंगखेडाप्रमाणेच दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्राचादेखील विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु तोही कागदावरच राहिला. प्रकाशा केवळ तीर्थक्षेत्र विकास निधीतून तोकडा निधी मिळून त्याद्वारे कामे केली जात आहेत.

तोरणमाळ येथील पर्यटन केंद्राचा विकासदेखील पुढे सरकू शकला नाही. येथील रोपवे, पॅराग्लायडिंग, इको टुरिझम, हेलिकॅाप्टर राइड या घोषणा स्वप्नवत होत्या व अद्यापही स्वप्नच बनून राहिल्या आहेत.

नवीन सरकारने तरी यातील काही प्रस्तावांच्या फाइलींवरील धूळ झटकावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.