शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव पी व जांब बु.प्रा.आ. केंद्राच्या रुग्वाणहिकेचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST

वानोळा दलित वस्तीत दोन हायमास्ट पथदिवे माहूर : वानोळा ग्रामपंचायत हद्दीतील वानोळा गाव व तांडा येथे जिल्हा परिषद ...

वानोळा दलित वस्तीत

दोन हायमास्ट पथदिवे

माहूर : वानोळा ग्रामपंचायत हद्दीतील वानोळा गाव व तांडा येथे जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड यांच्या पुढाकारातून दोन लाख ९९ हजार रुपयांचा निधी खर्च करत दलित वस्तीमध्ये दोन हायमास्ट पथदिवे उभारण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांची ही हायमास्ट पथदिव्यांची मागणी होती. त्यानुसार सरपंच डॉ.रविकुमार मेंडके यांच्या मार्गदर्शनात गावात हायमास्ट उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी संजय राठोड यांच्यासह सरपंच डॉ. रविकुमार मेंडके यांचे आभार मानले. यावेळी सरपंच डॉ.रविकुमार मेंडके, उपसरपंच सुरेश राठोड, माजी उपसरपंच अभिजित राठोड, तारासिंग चव्हाण, मारुती पांडे, सुनीता सिडाम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संभाजी भिलवंडे यांनी केली

गृहविलगीकरणात कोरोनावर यशस्वी मात

नरसीफाटा : डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन केले तर कोरोनासारख्या गंभीर आजारावर लीलया मात केली जाऊ शकते. याचे उत्तम उदाहरण नायगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी घालून दिले. त्यांनी सहकुटुंब गृहविलगीकरणात राहून कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

१४ एप्रिल रोजी संभाजी भिलवंडे यांना कोरोनाची लागण झाली. एक-दोन दिवसातच त्यांच्या पत्नी रंजनाताई भिलवंडे, मुलगा हर्षल व पुतण्या सत्यजित भिलवंडे यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच अनेकजण भयग्रस्त होतात. भीतीबरोबरच अज्ञानामुळे आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे, तर काहींनी स्वहस्ते जीवनयात्रा संपविली आहे. जे दृढनिश्चयी होते त्यांनी कोरोनावर सहजतेने मात केली आहे. संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच भिलवंडे अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी अत्यंत संयमाने डॉ. विश्वास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालन, डॉ. अनिस शेख यांचे मार्गदर्शन घेतले.

घरातच विलगीकरण कक्षात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या आणि औषधे घेतली. त्याचबरोबर हळद घालून गरम केलेले गरम पाणी, पाण्याची वाफ घेतली. योग्य आहार घेऊन ते आणि त्यांचे कुटुंब आता कोरोनामुक्त झाले. कोरोना झाला तर घाबरून न जाता डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार औषधी, योग्य आहार व व्यायाम केला तर कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर सहज मात केली जाऊ शकते, असे भिलवंडे यांनी सांगितले.

मन्याड नदीवरील पुलाचे भूमिपूजन

मुखेड : मुखेड-कंधार दोन तालुक्यांना जोडणारा अतिशय नजीकचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या नारनाळी गावाजवळील मन्याड नदीवरील पुलाचे बांधकाम स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरू झाले असून, आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले. या पुलाच्या बांधकामानंतर मुखेड तालुक्यातून कंधार तालुक्यात जाण्यासाठी अतिशय जवळचा मार्ग कार्यान्वित होणार आहे.

यावेळी कृउबा सभापती खुशाल पाटील उमरदरीकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, भाजप तालुका अध्यक्ष डॉक्टर वीरभद्र हिमगिरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड, भाजप शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, सुधीर चव्हाण उपस्थित होते. आमदार डाॅ. तुषार राठोड यांनी या पुलासाठी पाठपुरावा करून मंजुरी मिळून आणावी यासाठी नारनाळी व कार्ला या गावातील नागरिकांनी त्यांना साकडे घातले होते. गावचे सरपंच भुजंग देहारे, उपसरपंच माधव उलगुलवाड, ग्रामपंचायत सदस्य विकास रायवडे, गणेश बीरू, रघुनाथ यमुलवाड, पोलीसपाटील शिवाजी बांदेवाड, उमेश अडकीने, हणमथ अडकीने, नारायण सोमवरे, किसन धाडेकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.