शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत नियमांचे पालन, बाहेर मात्र फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST

नांदेड : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे ‘अत्यावश्यक सेवा’वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत; ...

नांदेड : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे ‘अत्यावश्यक सेवा’वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत; परंतु त्यानंतरही बँकांसमोरील गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही. बँकांमध्ये नियमांचे पालन करून सेवा देण्यात येत असली तरी, बँकेच्या बाहेर मात्र नागरिक नियमांचा फज्जा उडवित असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी बँकांतील कर्मचारी बाधित निघाल्याने अनेक दिवस बँक बंद ठेवण्याचा निर्णय अनेक बँकांवर आला होता.

कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत; परंतु ग्राहकांची गैरसोय होऊ नये, आर्थिक व्यवहाराला धक्का लागू नये म्हणून बँका सुरू ठेवण्यात आल्या आहेत; परंतु बँकांनी नियमांचे कठोरपणे पालन करावे, अशी अट घालण्यात आली आहे. त्यानुसार बँकांनी प्रत्येक काैंटरच्या समोर आडोसा उभा केला आहे तसेच मुख्य प्रवेशद्वार बंद करून एकावेळी दोन ते तीन ग्राहकांनाच मध्ये सोडण्यात येत आहे. आतमध्ये काैंटरसमोरील रांगेत सुरक्षित अंतर आहे की नाही? याची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी करण्यात येत आहे.

परंतु बँकेच्या बाहेर मात्र सर्वत्र गोंधळ सुरू आहे. नागरिक एकमेकांना खेटूनच या ठिकाणी उभे राहत आहेत तर एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशीनच्या बाहेरही लांबलचक रांगा लागत आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा पूर्णपणे फज्जा उडविण्यात येत आहेत. यातील अनेकजण तर सर्रासपणे विनामास्क रांगेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच प्रत्येक काैंटरसमोर सुरक्षित अंतरासाठी बॅरिकेट लावले आहेत. त्यामुळे ग्राहक आणि बँकेच्या कर्मचारी यामध्ये अंतर राहते तसेच एकाचवेळी दोन ते तीन ग्राहकांनाच आतमध्ये सोडण्यात येत आहे. हे ग्राहक बाहेर पडल्यानंतरही इतर ग्राहकांना आतमध्ये सोडण्यात येत आहे.

-बँक अधिकारी

बँकेत मोजक्याच ग्राहकांना प्रवेश देण्यात येत आहे. बँकेच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी सुरक्षित अंतरावर उभे राहण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत; परंतु अनेकदा ग्राहकांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यासाठी सुरक्षा रक्षकाला हस्तक्षेप करावा लागतो. कर्मचारी आणि ग्राहक कोरोना बाधित होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.

- बँक अधिकारी

ग्रामीण भागात बँकेची शाखा नसल्यामुळे शहरात आलो आहे; परंतु या ठिकाणी कोरोनामुळे अनेक तास रांगेत उभे रहावे लागत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांना बँकेने अधिक प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी रक्कम काढून रुग्णालयात जमा करावयाची आहे. त्यामुळे विलंब होत आहे.

-रमेश गावडे

बँकेत दररोज पैसे भरण्यासाठी यावे लागते. परंतु या ठिकाणी बँकेकडून मोजक्याच ग्राहकांना आत सोडले जात आहे. तसेच बँकेच्या आतमध्येही कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. बाहेर ग्राहकांच्या रांगा लावण्यात आल्या आहेत. त्यावर सुरक्षा रक्षक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो.

-शंकर स्वामी

जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार बंद आहेत. परंतु अत्यावश्यक असल्यासच बँकेची पायरी चढत आहे. परंतु या ठिकाणी नागरिकांना नियमांचे भान राहिले नसल्याचे दिसत आहे. कितीही प्रयत्न केला तरी नागरिक एकमेकांना खेटत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.

-पंकज भायेकर