शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

माहितीअभावी लसीकरणासाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने अवघ्या ५ केंद्रांवर लसीकरण करण्यात ...

नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने अवघ्या ५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीची उपलब्धता आणि कोणत्या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे, याची माहिती नागरिकांना देण्यात प्रशासन कमी पडत असल्याने नागरिकांची धावाधाव होत आहे. सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने दीड लाख लसींची मागणी केली आहे. परंतु, मंगळवारी जिल्ह्यासाठी ३ हजार कोव्हॅक्सिन तर १० हजार कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध झाला. यातील १,४०० कोव्हॅक्सिन नांदेड शहरासाठी देण्यात आल्या. महानगरपालिकेने शहरातील हैदरबाग तसेच जिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्र सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे नांदेड शहरातील १३पैकी या दोनच केंद्रांवर नागरिक लसीकरणासाठी आले होते. मात्र, ग्रामीण भागातील नेमकी किती केंद्र सुरू राहणार? याची कसलीही माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना देण्यात आली नाही. त्यामुळे बंद असलेल्या लसीकरण केंद्रांवरही नागरिकांनी रांगा लावल्याचे दिसून आले. सध्या जिल्ह्यात ४३२ लसीकरण केंद्र आहेत. यातील ३७५ केंद्र ग्रामीण भागात आहेत. अनेक केंद्रांवर लसीकरण ठप्प झालेले आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक गर्दी करत असल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

चौकट--------------

जिल्हा प्रशासनाने दीड लाख लसींची मागणी शासनाकडे केली आहे. यातील १३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. शहरातील दोन केंद्रांसह धर्माबाद येथील रुग्णालयात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे तर ग्रामीण भागात तुप्पा व अर्धापूर येथे लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक नीळकंठ भोसीकर यांनी दिली.