शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची येथील कुसुम सभागृहात सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी जिल्हाभरातून ...

जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची येथील कुसुम सभागृहात सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी जिल्हाभरातून आलेल्या पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे कुसुम सभागृह तुडुंब भरले होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुका ह्या काही पक्षांच्या चिन्हांवर लढविल्या जात नाहीत. तरीही विशिष्ट पक्षाच्या विचारांनी प्रभावित असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढविली होती. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस विचारांचे पॅनल विजयी झाले असून महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी चांगले यश मिळविले आहे.

विजयी झालेल्या उमेदवारांचे कौतुक करतानाच गटातटांचे राजकारण बंद करून गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. तब्बल तीन तास चाललेल्या या सत्कार सोहळ्यास माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, विधान परिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार हणमंतराव पाटील-बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील, रावणगावकर, आदींची उपस्थिती होती.