शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या बचावासाठी विद्युत तारांचे बेत शेतकऱ्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:56 IST

 वन विभागाकडे ना उपाययोजना ना मदत

ठळक मुद्दे खबरदारीची गरज  शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न

कासराळी (नांदेड ) : येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या बामणी बु.येथील गेटकेवार पिता-पूत्रांचा शेतातील धुऱ्याच्या कडेने रानडुकरापासून पिकाच्या बचावासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनात वीज प्रवाह सोडल्याने मंगळवारी धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेच्या पश्चात  या अनुषंगाने निर्माण झालेल्या बाबींचा नैसर्गिक आपत्तीत समावेशच नाही. तर दुसरीकडे या घटना आगामी काळातील संभाव्य घटना टाळण्यासाठी ना वनविभागाकडे उपाययोजना आहे ना महसुलची मदत मिळणार नसल्याने शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

मंगळवारी बामणी बु.येथील रजनीकांत गेटकेवार (४०) हे मुलगा विजय (१४) याच्यासमवेत स्वत:च्या शेतातील मूग पिकास आणि मसाई पुजण्यास गेले होते. शेतालगतच असलेल्या संजय गेटकेवार यांच्या शेतीतील धु-यावर तारांच्या कुंपनात विद्युत प्रवाह सोडल्याने या पितापूत्राचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला़ मात्र ज्या कारणांनी हा विद्युत प्रवाह सोडला ते केवळ रानडुक्करे आणि अन्य वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीपासून बचावासाठी असला तरी हा  प्रकार ग्रामीण भागात सर्रासपणे केला जातो. वास्तविक अशी घटना नैसर्गिक आपत्तीत गणली जात नाही असा सरकारी निकष आहे. मात्र वनविभागांकडून या प्राण्यांवर बंदोबस्तासाठी कसलेही उपाययोजना नाहीत ना अश्या घटनातील शेतक-यांना मदत. केवळ पिकांच्या नुकसानीची मदत मिळते इतकेच तर दुसरीकडे महसुल विभागांकडून विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडूनही घटना नैसर्गिक आपत्तीत येत  नसल्याने आर्थिक मदतही मिळत नाही. तर तिसरीकडे वीज वितरण कंपनी अशा घटनांची जबाबदारी घेत नाही ना वीज प्रवाह सोडणा-या शेतक-यांना प्रतिबंध करत नाही.मात्र यात गाफील शेतक-यांचा हकनाक बळी जातो अशी ही विसंगती आढळून येते. मात्र अशा भविष्यात घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना आणि जागृतीची गरज आहे. ज्यामुळे भविष्यात अश्या घटना टाळणे शक्य होईल. अनेकांचे जीव वाचतील 

अधिकारी म्हणतात ...नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जिवीतहानी जसे वीज पडणे आणि पूर येणे अशा आपत्तीसाठी महसुल विभागाची मदत आहे - डॉ.ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार, बिलोली़वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा पिकांचे नुकसान झाल्यासच वनविभाग संबंधितांना आर्थिक मदत करते़ मात्र अपघातजन्य किंवा अन्य बाबींतील आर्थिक व जीवीत नुकसानीसाठी वनविभाग मदत करीत नाही -शिवानंद कोळी, वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूरशेतक-यांना अशा घटनांना सामोरे जावे लागते याचे खेद आहे़ मात्र शेतकऱ्यांकडून खबरदारी ही घेणे ही गरजेचे आहे  -विजय घुगे, तालुका कृषी अधिकारी, बिलोली़

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यूRevenue Departmentमहसूल विभाग