शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

पिकांच्या बचावासाठी विद्युत तारांचे बेत शेतकऱ्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:54 PM

 वन विभागाकडे ना उपाययोजना ना मदत

ठळक मुद्दे खबरदारीची गरज  शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न

कासराळी (नांदेड ) : येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या बामणी बु.येथील गेटकेवार पिता-पूत्रांचा शेतातील धुऱ्याच्या कडेने रानडुकरापासून पिकाच्या बचावासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनात वीज प्रवाह सोडल्याने मंगळवारी धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेच्या पश्चात  या अनुषंगाने निर्माण झालेल्या बाबींचा नैसर्गिक आपत्तीत समावेशच नाही. तर दुसरीकडे या घटना आगामी काळातील संभाव्य घटना टाळण्यासाठी ना वनविभागाकडे उपाययोजना आहे ना महसुलची मदत मिळणार नसल्याने शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

मंगळवारी बामणी बु.येथील रजनीकांत गेटकेवार (४०) हे मुलगा विजय (१४) याच्यासमवेत स्वत:च्या शेतातील मूग पिकास आणि मसाई पुजण्यास गेले होते. शेतालगतच असलेल्या संजय गेटकेवार यांच्या शेतीतील धु-यावर तारांच्या कुंपनात विद्युत प्रवाह सोडल्याने या पितापूत्राचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला़ मात्र ज्या कारणांनी हा विद्युत प्रवाह सोडला ते केवळ रानडुक्करे आणि अन्य वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीपासून बचावासाठी असला तरी हा  प्रकार ग्रामीण भागात सर्रासपणे केला जातो. वास्तविक अशी घटना नैसर्गिक आपत्तीत गणली जात नाही असा सरकारी निकष आहे. मात्र वनविभागांकडून या प्राण्यांवर बंदोबस्तासाठी कसलेही उपाययोजना नाहीत ना अश्या घटनातील शेतक-यांना मदत. केवळ पिकांच्या नुकसानीची मदत मिळते इतकेच तर दुसरीकडे महसुल विभागांकडून विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडूनही घटना नैसर्गिक आपत्तीत येत  नसल्याने आर्थिक मदतही मिळत नाही. तर तिसरीकडे वीज वितरण कंपनी अशा घटनांची जबाबदारी घेत नाही ना वीज प्रवाह सोडणा-या शेतक-यांना प्रतिबंध करत नाही.मात्र यात गाफील शेतक-यांचा हकनाक बळी जातो अशी ही विसंगती आढळून येते. मात्र अशा भविष्यात घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना आणि जागृतीची गरज आहे. ज्यामुळे भविष्यात अश्या घटना टाळणे शक्य होईल. अनेकांचे जीव वाचतील 

अधिकारी म्हणतात ...नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जिवीतहानी जसे वीज पडणे आणि पूर येणे अशा आपत्तीसाठी महसुल विभागाची मदत आहे - डॉ.ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार, बिलोली़वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा पिकांचे नुकसान झाल्यासच वनविभाग संबंधितांना आर्थिक मदत करते़ मात्र अपघातजन्य किंवा अन्य बाबींतील आर्थिक व जीवीत नुकसानीसाठी वनविभाग मदत करीत नाही -शिवानंद कोळी, वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूरशेतक-यांना अशा घटनांना सामोरे जावे लागते याचे खेद आहे़ मात्र शेतकऱ्यांकडून खबरदारी ही घेणे ही गरजेचे आहे  -विजय घुगे, तालुका कृषी अधिकारी, बिलोली़

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यूRevenue Departmentमहसूल विभाग