शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनी सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
6
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
7
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
8
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
9
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
10
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
11
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
12
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
13
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
14
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
15
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
16
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
17
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
19
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
20
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी साहित्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते -प्रा. माधव सरकुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST

नांदेड - साहित्यिक तथा विद्वानांच्या प्रतिभा मुक्त असल्या पाहिजेत. त्या व्यवस्थेच्या गुलाम असता कामा नयेत. साहित्य हे ...

नांदेड - साहित्यिक तथा विद्वानांच्या प्रतिभा मुक्त असल्या पाहिजेत. त्या व्यवस्थेच्या गुलाम असता कामा नयेत. साहित्य हे समाज घडविण्याचे आणि लढवण्याचे काम करते. चमडीबचाव आणि सावधगिरीचे साहित्य कुचकामी असते. असे साहित्यिक भूमिकाहीन असतात. त्याउलट आंबेडकरी साहित्य हे संघर्षशील आहे, त्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा. माधव सरकुंडे यांनी केले.

ते डॉ. आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, साहित्यिक अशोक बुरबुरे, सज्जन बरडे, अरविंद निकोसे, संजय मोखडे, सुनील कुमरे, साहेबराव पाईकराव, दीपक भालेराव आदींची उपस्थिती होती. अ. भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने या जयंतीनिमित्त सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते झाले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प यवतमाळ येथील प्रा. माधव सरकुंडे यांनी गुंफले. ‘आजच्या साहित्यिक, बुद्धीजीवींची जबाबदारी काय?’ या विषयावर ते म्हणाले की, पांढरे कागद काळे करणे म्हणजे साहित्यलेखन नव्हे. हस्तिदंती मनोऱ्यात बसून कल्पनेचे इमले बांधणारे साहित्य विचार प्रसवनारे नसते. कारण सत्य समजले की, माणूस स्वस्थ बसत नाही. तो अन्यायाच्या विरोधात न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी साहित्य निर्मिती करतो. परिवर्तनासाठी करारी, धाडसी आणि कणखर भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

चौकट....

मोदी सरकार धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरोधात

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समाजवाद, विज्ञानवाद ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आहेत; परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून लोकांच्या मनातील धर्मनिरपेक्षतेची भावना काढून टाकण्याच्या कामाला लागले आहे. खाजगीकरण, आरक्षणाचे राजकारण, निर्गुंतवणुकीकरण, नोकऱ्यांची व्यपगतता आणि धार्मिक तुष्टीकरणाचे काम हे सरकार करीत असल्याचेही प्रा. माधव सरकुंडे म्हणाले.