शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
3
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
4
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
5
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
6
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
8
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
9
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
10
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
11
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
12
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
13
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
14
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
15
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
16
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
17
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
18
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
19
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
20
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 18:31 IST

नेपाळ सरकारने भारताकडून येणाऱ्या १०० रुपयांच्या सामानावर सीमा शुल्क लावल्याने ५० लाख मधेशी नागरिक संकटात आले आहेत.

भारत आणि नेपाळ यांच्यात शतकानुशतके 'रोटी-बेटी'चे संबंध राहिले आहेत. मात्र, नेपाळ सरकारने घेतलेल्या एका ताज्या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या ५० लाख मधेशी नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. नेपाळ सरकारने आता असा आदेश काढला आहे की, भारत सीमेवरून १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोणतेही सामान नेल्यास त्यावर सीमा शुल्क भरावे लागेल. या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याने मधेश प्रांतात संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे नेमका वादग्रस्त आदेश?

नेपाळ सरकारच्या आदेशानुसार, आता कोणत्याही व्यक्तीला भारतामधून १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सामान विनाशुल्क नेता येणार नाही. यापूर्वी लोक सहजपणे घरगुती रेशन, कपडे आणि गरजेच्या वस्तू भारतातून स्वस्त दरात घेऊन येत असत. मात्र, आता सीमा सुरक्षा दलाने तपासणी कडक केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

मधेशी नागरिक का आहेत काळजीत?

मधेश प्रांतातील लोकांचे जीवन संपूर्णपणे भारत-नेपाळ व्यापारावर अवलंबून आहे. नेपाळच्या इतर प्रांतांच्या तुलनेत मधेशमध्ये महागाई कमी होती, कारण इथले नागरिक भारतातून स्वस्त दरात सामान आणत असत. आता या नवीन करामुळे रोजच्या जगण्याचा खर्च दुप्पट झाला आहे.

मोठा किमतीचा फरक: नेपालमध्ये मोहरीचे तेल सुमारे ४०० ते ६०० रुपये (नेपाळी चलन) प्रति लिटर आहे, तर भारतात ते अवघ्या १५० रुपयांच्या आसपास मिळते.

साखर आणि रेशन: साखरेच्या किमतीतही अशीच तफावत असल्याने सामान्य नागरिक भारतातून खरेदीला पसंती देत होते, ज्यावर आता निर्बंध आले आहेत.

लग्नाळू आणि नातेवाईकांसाठी मोठी अडचण

नेपाळ आणि भारत यांच्यात सीमा खुली असल्याने हजारो लोकांची लग्ने दोन्ही देशांत झाली आहेत. एका अंदाजानुसार, ३ लाखांहून अधिक कुटुंबे अशी आहेत ज्यांचे नातेवाईक सीमेच्या दोन्ही बाजूला राहतात. आता या नातेवाईकांना भेटीसाठी जाताना साधे गिफ्ट नेणेही कठीण झाले आहे. १०० रुपयांहून अधिक किमतीची भेटवस्तू नेली तरी सीमेवर टॅक्स भरावा लागत असल्याने नातेसंबंधांत दुरावा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सरकारचा दावा: महसूल वाढवण्यासाठी पाऊल

नेपाळ सरकारने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, स्थानिक व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि सरकारी महसूल वाढवण्यासाठी ही कडक पावले उचलली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, केवळ मार्च महिन्यातच लक्ष्याच्या ८५ टक्के महसूल वसूल करण्यात यश आले आहे. मात्र, या महसुलाच्या नादात ५० लाख गरीब मधेशींचे जगणे कठीण झाले आहे, याचे भान सरकारने ठेवावे, अशी मागणी होत आहे. या निर्णयामुळे मधेश प्रांतात महागाईचा भडका उडाला आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत