शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सीबीएसई बारावीचे १ हजार २०० विद्यार्थी परीक्षा न देताच झाले पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. २०२० मध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा ...

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. २०२० मध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्णसंख्या व मृत्यूची संख्या लक्षात घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षासंदर्भात शासन कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे नियोजित परीक्षेचे वेळापत्रक रद्द करण्यात आले होते. देशभरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने यापूर्वी दहावीची परीक्षादेखील रद्द केली आहे. याच धर्तीवर राज्याच्या शिक्षण विभागाने सुद्धा दहावीची परीक्षा रद्द केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झाला नाही. त्यामुळे यावर्षीच्या सीबीएसई बारावीची परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देत या काळात परीक्षेचा ताण देणे उचित ठरणार नसल्याने बारावीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील बारावीचे सीबीएसईचे १ हजार २०० विद्यार्थी परीक्षा न देताच पास झाले आहेत.

चौकट-

सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यामुळे जिल्ह्यातील सीबीएसई बारावीचे १ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर होणार आहे. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड

चौकट-

सध्याच्या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अवघड बाब होती. त्यामुळे परीक्षा रद्द करणे योग्यच होते. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर परिश्रम घेतले होते. त्यांचे नुकसान झाले आहे.

-प्रा. धाराशिव शिराळे, शिक्षणतज्ज्ञ, नांदेड.

चौकट-

कोरोनामुळे वर्षभर असेच गेले. त्यात ऑनलाइन शिक्षण दिल्यामुळे अभ्यासक्रमही अपूर्णच होता. अनेक अडचणीनंतरही अभ्यास केला. मात्र, परीक्षा देण्याची मन:स्थिती नव्हती. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे परीक्षेचे टेन्शन होते. आता परीक्षा रद्द केल्यामुळे बरे वाटत आहे.

-आकाश कवडे, विद्यार्थी.

चौकट-

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बारावीनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य पदवी शाखेचे प्रवेश कोणत्या निकषावर केले जाणार आहेत. हे अद्याप निश्चित नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला आहे.