शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

काबाडकष्टासाठी बिहारमधून अल्पवयीन मुलांची तस्करी; आरपीएफच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघड

By नरेश डोंगरे | Updated: November 18, 2024 19:03 IST

Nagpur : रेल्वे स्थानकावर आरोपीची मुलांवर जोरजबराई

नरेश डोंगरे - नागपूर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कबाडकष्टाचे काम करवून घेण्यासाठी ६ अल्पवयीनांसह ९ मुलांची बिहारमधून तस्करी करण्यात आल्याचे खळबळजनक प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून प्रमोद यादव आणि संजय यादव अशी त्यांची नावे आहेत.

आरपीएफच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपुरात खासगी कंपनीत काम आणि भरपूर पगार मिळत असल्याची बतावणी करून बिहारच्या भोजपूर आणि बक्सर जिल्ह्यातून ९ अल्पवयीन मुलांना नागपुरात आणण्यात आले. यातील ३ मुले १८ वयोगटातील आणि सहा मुले १२ ते १५ वयोगटातील आहेत. नागपुरात आणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कष्टाच्या कामावर जुंपण्यात आले. करवून घेतले जाणारे काम कठीण असल्याने आणि खाण्यापिण्याचे, राहण्याचेही वांदे असल्याने ही मुले काही दिवसातच रडकुंडीला आली. त्यांनी संधी साधून १४ नोव्हेंबरला गावाला पळून जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले. तिकिट काऊंटरजवळ आल्यानंतर त्यांची रडवेली स्थिती आणि संशयास्पद वर्तन रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकाने सीसीटीव्हीत टिपले. त्यांना एक व्यक्ती तेथून बाहेर नेण्यासाठी जोरजबराई करीत असल्याचेही सीसीटीव्हीत दिसत होते. ही माहिती आरपीएफच्या वरिष्ठांसह क्राईम प्रिव्हेंशन अँड डिटेक्शन स्क्वॉड (सीपीडीएस)ला कळविण्यात आली. त्यानुसार, आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त मनोजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मनोज पांडे, हवलदार विक्रमसिंग ठाकूर, कॉन्स्टेबल नीरजकुमार, दीपा कैथवास, विणा सोरेन आदींनी धावपळ करून लगेच त्या ९ मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या आरोपी प्रमोद यादव यालाही पकडण्यात आले.

प्राथमिक चाैकशीत मुलांनी आपले नाव, पत्ता सांगून आरोपी प्रमोद आणि संजय यादवने हलके फुलके काम आणि चांगले पैसे देण्याचे आमिष दाखवून बिहारमधून नागपुरात आणल्याचे आणि येथे त्यांच्याकडून जोरजबराईने ठिकठिकाणी अवजड कामे करवून घेत असल्याचेही सांगितले. त्यावरून आरपीएफने हे प्रकरण चाैकशीसाठी लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांना सोपविले. प्राथमिक चाैकशीनंतर ठाणेदार गाैरव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी प्रमोद यादवला बोलते करून त्याच्याकडून दुसरा आरोपी संजय यादवचा संपर्क क्रमांक मिळवून त्यालाही ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध मानवी तस्करीसोबतच बाल न्याय अधिनियम आणि बाल श्रम विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.मुलांची शासकीय आश्रयगृहात रवानगी

रेल्वे पोलिसांनी जिल्हा सुरक्षा अधिकारी तसेच चाईल्ड लाईनच्या मदतीने सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांना शासकीय आश्रयगृहात दाखल केले. या प्रकरणात अनेक आरोपी असण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीnagpurनागपूर