शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! कोविड सेंटरमध्ये २४ तासात सहा रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील वरोडा नजीकच्या कोविड केअर सेंटर येथे गत २४ तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. योग्य ...

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील वरोडा नजीकच्या कोविड केअर सेंटर येथे गत २४ तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. योग्य औषधोपचार मिळाला नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांच्यावतीने करण्यात आला आहे.

चिरकूट भगवान पाटील (५७) रा.सेलू , लक्ष्मी अजाबराव ठाकरे (७०) रा.कळमेश्वर, ज्ञानेश्वर मेश्राम (५६) रा. कळमेश्वर, शंकर विठ्ठल गणोरकर (५२) रा.लिंगा, श्रीराम राजाराम खसारे (६६) रा.घोराड अशी गुरुवारी मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे आहे. शुक्रवारी रमेश रामक्रिष्णा किरपाल (४०) रा. कळमेश्वर या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पाच रुग्णांचे मृतदेह गुरुवारी दुपारनंतर कोविड सेंटरमध्येच होते. येथे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने शेवटी मृतांच्या नातेवाईकांनी रात्री मृतदेह सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. याप्रसंगी मृतांच्या नातेवाईकांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यावर राग अनावर झाल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद क्षमविला. या सर्व रुग्णांच्या पार्थिवावर शुक्रवारी कळमेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. १९ मार्चपासून सुरु करण्यात आलेल्या या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी एकूण तीन डॉक्टर आणि तीन नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी एक नर्स सध्या पॉझिटिव्ह आल्याने सध्या दोनच नर्स येथे कार्यरत आहेत.

१०० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये ६० रुग्णावर उपचार सुरु आहेत. यातील १० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चार रुग्णांना ऑक्सिजन लागले आहे. येथे रुग्णावर योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप आहे. येथे रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे.

केवळ थातूरमातूर उपचार

दीड लाखांची लोकसंख्या असलेल्या कळमेश्वर तालुक्याला कोरोनाने विळखा घातला आहे. मात्र वरोडा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणारी योग्य यंत्रणा नाही. यासोबतच आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीचाही अभाव आहे. येथे पूर्णवेळ डॉक्टर कधीच उपलब्ध नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

--

वरोड्याच्या कोविड सेंटरमध्ये गुरुवारी रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह मरचुरी मध्ये ठेवण्यात आले. रात्री कोविड सेंटर येथे रुग्णांच्या नातेवाईक आले असताना खंडविकास अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. सर्व मृतदेहावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळात कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची आहे. संबंधिताना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यानंतर असा प्रकार घडणार नाही.

सुजाता गावडे, नायब तहसीलदार, कळमेश्वर