शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

By नरेश डोंगरे | Updated: May 15, 2025 20:27 IST

Nagpur Railway Passenger Theft News: या टोळीतील तिघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

नरेश डोंगरे, नागपूर: विविध रेल्वे गाड्या आणि वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर संधी मिळताच रेल्वे प्रवाशांचे किंमती साहित्य लंपास करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा येथील रेल्वे पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पंकज शुभम रणगिरे (वय २२, रा. किरणापूर बडगाव, बालाघाट), रितेश उर्फ मोनू भरतलाल रणिगरी (वय २८, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) आणि जी. शंकर कनेशन (वय ३२, रा. मदुराई श्रीमंगलम, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हुसेनीपूर बिहार येथील गाैतमकुमार रॉय (वय १९) हा तरुण कामाच्या निमित्ताने नागपुरात आला होता. गावाला जाण्यासाठी तो बुधवारी रात्री रेल्वे स्थानकावर आला. गाडीला वेळ असल्याने मध्यरात्री फलाट क्रमांक तीनवर बसला. मध्यरात्री १ च्या सुमारास त्याच्या बॅगमधून अज्ञात आरोपीने २८ हजारांचा मोबाईल लंपास केला. हे लक्षात आल्यानंतर गाैतमकुमारने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. त्याची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पहाटे ३ च्या सुमारास विदिशा, मध्य प्रदेश येतील रहिवासी रंजित अहिरवार याच्या बॅगमधील मोबाईल चोरीला गेला. ही चोरीची घटना फलाट क्रमांक ८ वर घडली. अवघ्या दोन तासात दोन फलाटांवर चोरीच्या दोन सारख्या घटना घडल्याने रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोन्ही फलाटांवरच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासणे सुरू केले.

पुन्हा हात मारण्याची तयारीया दोन्ही चोऱ्या करणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, ते ईकडून तिकडे वारंवार गर्दीच्या ठिकाणी शिरत असल्याने चोरटे सापडत नव्हते. रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बरीच शोधाशोध करावी लागली. आज दुपारी रेल्वे स्थानकावर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पंकज, रितेश आणि जी. शंकर हे तिघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांना ठाण्यात आणून झडती घेतली असता आज पहाटे चोरलेले दोन आणि अन्य तीन असे पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

गुन्हे उघड होण्याची शक्यताया टोळीत आणखी काही सदस्य असावे, असा पोलिसांना संशय असून, त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीश अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, अप्पर अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे यांच्या नेतृत्वात सपोनि सुनिल उईके, एएसआय श्रीधर पेंदोर, हवलदार संजय पटले तसेच रुपेश धोंगडी, आशिष काळे आणि आरपीएफचे उपनिरीक्षक शिवराग सिंह, अश्विन पवार, कामसिंग ठाकूर, निरज कुमार आदींनी या टोळीच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावली.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी