शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी भागातच सर्वाधिक प्राणांतिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:09 IST

Road Accident News २०१९ मध्ये तब्बल ८० टक्के प्राणांतिक अपघात हे रहिवासी भागातच झाले होते. तर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर लोकांनी जीव गमावला होता.

ठळक मुद्देराष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर बळीअपघातांचे प्रमाण ८० टक्के

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी शहरांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठांच्या मार्गावर सर्वाधिक अपघात होतात असा समज आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूरकरांसाठी रहिवासी भागात होणारे अपघातच सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. २०१९ मध्ये तब्बल ८० टक्के प्राणांतिक अपघात हे रहिवासी भागातच झाले होते. तर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर लोकांनी जीव गमावला होता.

एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये नागपुरात १ हजार ११९ अपघात झाले. त्यात एकूण २७० नागरिकांचे बळी गेले व ८९९ लोक जखमी झाले. प्राणांतिक अपघातांत तब्बल २१८ जणांचा जीव रहिवासी भागांतील अपघातांत गेला. यात १८२ पुरुष तर ३६ महिलांचा समावेश होता. तर शाळा-महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांजवळ झालेल्या अपघातांमध्ये २८ पुरुष व ७ महिलांसह ३५ जणांना जीव गमवावा लागला. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अनुक्रमे १७२ व ७७ अपघात झाले व यात ९८ लोकांचा मृत्यू झाला.

कार्यालयीन घाई, जीवावर येई
कार्यालय व आस्थापना सुरू होण्याची तसेच सुटण्याच्या वेळेतील घाई लोकांच्या जीवावर आली असल्याचे चित्र आहे. या सहा तासांत ३७६ अपघात झाले. ९ ते १२ च्या वेळेत १८७ अपघात झाले. तर रात्री ९ ते १२ या पार्टीटाईमच्या काळात १६७ अपघात झाले.

टॅग्स :Accidentअपघात