शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी प्राणपणाने लढणारे नेतृत्व

By admin | Updated: July 26, 2015 02:55 IST

बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा व विचारांचे प्रगाढ अभ्यासक, संसदीय लोकशाहीचे कट्टर समर्थक ,मुत्सद्दी राजकारणी आणि समाजालाच जीवन समर्पित करीत...

बौद्धांच्या सन्मानासाठी आमरण उपोषण : तुरुंगवासही भोगला प्रा. जोगेंद्र कवाडे बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा व विचारांचे प्रगाढ अभ्यासक, संसदीय लोकशाहीचे कट्टर समर्थक ,मुत्सद्दी राजकारणी आणि समाजालाच जीवन समर्पित करीत समाजासाठी प्रत्येक स्तरावर प्राणपणाने लढणारे कुशल नेतृत्व म्हणजे रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई होत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली धम्मक्रांती केली व लक्षावधी दलितांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हा भौतिक व आर्थिकदृष्ट्या विपन्न अवस्थेत असलेल्या दलितांना हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि देशामध्ये बौद्ध धम्माची प्रचंड लाट निर्माण झाली.धर्मांतरामुळे नवदीक्षित बौद्धांना मानसिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्यांच्या गरिबीची आणि दारिद्र्याची जाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. म्हणून धर्मांतर केलेल्या बौद्धांना आश्वस्त करण्यासाठी बाबासाहेब म्हणाले होते, ‘धर्मांतर जरी आपण केलं असलं तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या आरक्षणाचे अधिकार माझ्या खिशात शाबूत आहेत. हाच धागा पकडून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई, महामंत्री खा. ना.ह. कुंभारे व सी.एम. आरमुगम हे तिन्ही ज्येष्ठ नेते दिल्लीच्या ऐतिहासिक बोट क्लबवर बौद्धांच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसले होते. तेव्हा देशामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली. आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी हे तिन्ही नेते तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे बौद्धांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन घेऊन गेले होते. बौद्धांना आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात, अशाप्रकारचा आग्रह दादासाहेब गवई, कुंभारे आणि आरमुगम यांनी धरला. तेव्हा मोरारजी देसाई यांनी ‘कुणी सांगितले तुम्हाला बौद्ध बनायला’अशाप्रकारचे तुच्छतापूर्वक वक्तव्य केले. त्याचीच परिणती म्हणून बौद्धांचा झालेल्या अपमानाचा निषेध म्हणून व बौद्धांना आरक्षणाच्या सवलती मिळाल्याच पाहिजे या मागणीसाठी दिल्लीेच्या बोट क्लबवर तिन्ही नेते उपोषणावर बसले. संपूर्ण देशातील दलित-बौद्ध जनता ढवळून निघाली होती. देशभरात आंदोलन पेटले होते. १९७६ चा तो काळ होता. तेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. मी माझ्या पत्नीला घेऊन दिल्लीत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. उपोषणाला चार दिवस लोटले होते.संपूर्ण देशातील दलित-बौद्ध समाजबांधव या तिन्ही प्रमुख नेत्यांसाठी चिंतित होती.आम्ही सातत्याने दादासाहेब गवई, कुंभारे आणि आरमुगम यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती करीत होतो. ‘बचेंगे तो और लढेंगे’ अशी भूमिका घेऊन आम्ही त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती करीत होतो. परंतु ते जुमायला तयार नव्हते. आताच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू, या जिद्दीने ते प्राणपणाने लढत होते. त्यांचे उपोषण दिल्लीपुरते नव्हते, तर ते देशभरात पोहोचले होते. महाराष्ट्रात त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले होते. ठिकठिकाणी रेल्वे रोको, रास्ता रोको सुरू होते. इंदिरा गांधी, शशी भूषण, शांतिभूषण यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी त्यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. उपोषणाला आठ दिवस लोटले होते. कार्यकर्ते व समाजाच्या रेट्यामुळे नेत्यांनी आपले उपोषण मागे घेतले. परंतु आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन कायम होते. आम्ही कार्यकर्त्यांनी दिल्लीत भव्य मोर्चा काढला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात निघालेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहानंतरचा तो सर्वात मोठा मोर्चा होता. या मोर्चामुळे केंद्र सरकारही घाबरले होते. त्यांनी गवई, कुंभारे व आरमुगम या नेत्यांसह आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिल्लीच्या तिहार जेलमध्ये टाकले. तब्बल १४ दिवस आम्ही तुरुंगात होतो. दरम्यान, तुरुंगात असताना काही कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला खूप मारले होते. तेव्हा गवई यांच्या नेतृत्वगुणाचा परिचय दिसून आला. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याबाबत त्यांची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली. रिपाइंचे ऐक्य झाले तेव्हा आम्ही चार खासदार लोकसभेवर निवडून गेलो. आम्ही तेव्हा नवखे होतो. परंतु दादासाहेब गवई यांना संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला. संसदेत प्रश्न कसे मांडायचे. विविध संसदीय आयुधांचा वापर करून समाजाचे प्रश्न कसे मांडायचे. याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळाले. माझ्यासाठी तरी ते चालते-फिरते संसदीय विद्यापीठ होते.परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्याच्या विकासासाठी वाहून घेतले. त्यांच्या नेतृत्वगुण आणि दूरदृष्टीमुळेच दीक्षाभूमीवर आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहिले आहे.