शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

जगातले युद्धे थांबविण्याची क्षमता भारतातच : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:20 IST

Nagpur : जगातील संघर्षाचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना असून कायमस्वरूपी शांतता ही एकता, शिस्त आणि धर्मपालनातूनच साध्य होऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
जगातील संघर्षाचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना असून कायमस्वरूपी शांतता ही एकता, शिस्त आणि धर्मपालनातूनच साध्य होऊ शकते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत केवळ भारतच युद्ध थांबवू शकतो, अशी अपेक्षा जगभरातून व्यक्त होत असून तोच आपल्या देशाचा स्वभावही आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी जुने सुभेदार ले-आउट, अयोध्यानगर येथे विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला संत त्रिलोकदर्शन दासजी महाराज, गाझियाबाद, अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ मठाचे प. पू. जितेंद्रनाथ महाराज, केंद्रीय संघटनमंत्री मिलिंद परांडे, प्रसिद्ध उद्योजक अनंतकुमार बन्सल, राजेश गुप्ता यांच्यासह व्हीएचपीचे अध्यक्ष सुदर्शन शेंडे, नंदकिशोर दंडारे, हेमंत जांभेकर, मनीष मालानी, प्रशांत तितरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मोहन भागवत म्हणाले, जगातील अस्थिर परिस्थितीत संतुलन निर्माण करून धर्माधिष्ठित मूल्यांवर आधारित व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी भारतावर आहे. भारतातील लोक मानवतेच्या नियमांनुसार आचरण करतात, तर जगातील अनेक भाग अजूनही 'जंगलाच्या नियमां'वर चालतात. गेल्या दोन हजार वर्षात विविध विचारसरणींच्या माध्यमातून संघर्ष सोडविण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. आजही धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मातर आणि उच्च-नीचतेची भावना अस्तित्वात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेत 'सर्व एक आहेत' ही भावना मांडण्यात आली असून समाजाने संघर्षाऐवजी सहकार्य आणि समरसतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन करीत आधुनिक विज्ञानही हळूहळू याच विचारांकडे झुकत असल्याचे त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : India Alone Can Stop World Wars: Mohan Bhagwat States

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat believes India can halt global conflicts due to its inherent nature promoting unity and dharma. He stresses India's role in establishing a values-based system amid global instability, advocating cooperation over conflict, aligning with ancient wisdom and modern science.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत