शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव न झालेल्या घाटांमध्ये रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाकबंगला) : राज्य शासनाने रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी मध्यंतरी काही रेतीघाटांचे लिलाव केले आणि घाट कंत्राटदारांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पिपळा (डाकबंगला) : राज्य शासनाने रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी मध्यंतरी काही रेतीघाटांचे लिलाव केले आणि घाट कंत्राटदारांच्या स्वाधीन केले. प्रशासनाने काही घाट अ आणि ब असे विभागून त्यातील एकाच घाटाचा लिलाव केला. प्रशासनाचा हा निर्णय घाट कंत्राटदारांच्या पथ्यावर पडला. त्यांनी लिलाव घेतलेल्या घाटांसाेबतच लिलाव न घेतलेल्या घाटांमधील रेतीचा अवैध उपसा केल्याचे आढळून आले आहे. या रेती चाेरीमुळे राज्य शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असूनही महसूल विभागाचे अधिकारी याकडे मुद्दाम कानाडाेळा करत आहेत.

नागपूर व लगतच्या जिल्ह्यांमध्ये कन्हान नदीच्या तांबड्या रेतीला भरीव मागणी आहे. त्यामुळे सावनेर तालुक्यातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या विविध रेतीघाटांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, रेती चाेरट्यांनी या घाटांना लक्ष्य केले आहे. मध्यंतरी कन्हान नदीवरील काेणत्याही घाटाचा जिल्हा प्रशासनाने लिलाव न केल्याने एकीकडे रेतीचाेरीचे प्रमाण वाढले हाेते तर दुसरीकडे शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत हाेता. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील काही नद्यांवरील रेतीघाटांसाेबतच कन्हान नदीवरील काही घाटांचा लिलाव केला आणि काही घाट लिलावाविना ठेवले.

जिल्हा प्रशासनाने कन्हान नदीवरील काही घाटांची विभागणी करत त्यांचे अ, ब, क असे वर्गीकरण केले. लिलाव करताना अ घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करत ब घाट लिलावाविना ठेवले. अ आणि ब घाट हे लागून-लागून असल्याने खनिकर्म व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी त्या घाटांचे लिलाव घेणाऱ्याला मार्किंगही करून दिले. मात्र, घाट घेणाऱ्यांनी अ घाटासाेबतच ब घाटातील रेतीचाही माेठ्या प्रमाणात उपसा केला. हा रेती उपसा अवैध ठरत असला आणि याची महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इत्यंभूत माहिती असली तरी कुणीही याकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे लिलाव न केलेल्या रेतीघाटांमधील लाखाे ब्रास रेतीच्या राॅयल्टीवर राज्य शासनाला पाणी फेरावे लागले आहे. हा प्रकार सावनेर तालुक्यात सर्वत्र दिसून येताे.

...

रेतीघाट मुदत

जिल्हा प्रशासनाने मध्यंतरी लिलाव केलेल्या रेतीघाटांची मुदत ही १०जून २०२१पर्यंत निर्धारित केली आहे. घाटमालकांना या मुदतीनंतर लिलाव घेतलेल्या घाटांमधून रेतीची उचल करता येणार नाही. काही घाटांचे लिलाव तीन वर्षांसाठी करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या वर्षासाठी लिलावाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर करारनामा केला जाईल. त्या करारावर स्वाक्षरी झाल्यावर घाटाची माेजणी करून त्याचा कंत्राटदाराला ताबा दिला जाईल. त्या घाटातील रेती उचल करण्याची मुदत ही घाटाचा ताबा घेतल्यापासून १० जून २०२१पर्यंत असेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. पुढे १ ऑक्टाेबरनंतर घाटांचे नव्याने सर्वेक्षण करून घाटातील रेतीचा साठा व उपसा या बाबी निश्चित करण्यात येतील, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.