शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

हिरणवार टोळीचा नागपुरात दंगली घडविण्याचा होता 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:12 IST

पांढराबोडीतील रैलीमध्ये करणार होते फायरिंग : हे केवळ गुन्हेगार नसून समाजकंटकच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीतील कुख्यात हिरणवार टोळीने स्वतःचा बदला घेण्याच्या नादात नागपुरात दंगली घडविण्याचा कट रचला होता. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका रॅलीत फायरिंग करून नागपुरात इतर ठिकाणी हिंसाचार पसरविण्याचे त्यांचे षडयंत्र होते. धरमपेठेतील सोशा कॅफेचे मालक अविनाश भूसारी यांच्या हत्येनंतर परत चर्चेत आलेल्या हिरणतार टोळीला बेडचा ठोकल्यानंतर चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. 

हिरणवार टोळीच्या टार्गेटवर शेखू गँगचा सदस्य प्रवेश गुप्ता हा होता. प्रवेश गुप्ता १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पांढराबोडीत रॅलीचे आयोजन करतो याची त्यांना कल्पना होती. त्या रॅलीत फायरिंग करून प्रवेशचा गेम करण्याचे त्यांनी ठरविले होते. अर या रॅलीला रक्तरंजित गालबोट लागले असते तर त्याचे पडसाद इतर ठिकाणीदेखील उमटले असते व विविध ठिकाणी दंगली घडविण्याचा त्यांचा मानस होता. नागपुरात मार्च महिन्यात हिंसाचार झाला होता व त्यांना याच्या दहशतीची पूर्ण कल्पना होती. असे झाले असते तर हिरणतार टोळीची दहशत आणखी वाढली असती, हाच यामागचा त्यांचा विचार होता. मात्र त्या दिवशी त्यांचा तो कट शिजू शकला नाही. गुप्ता हाती न लागल्यामुळे अखेर त्यांनी पवन हिरणवार हत्याकांडातील आरोपी अवी भुसारीचा भाऊ अविनाश भुसारीची हत्या करण्याचे वेळेवर ठरविले. 

काहीही करून बदला घ्यायचा, हेच हिरणवार टोळीच्या डोक्यात होते. त्यामुळे कुठल्याच प्रकरणात काहीही सहभाग नसताना व काहीच घेणेदेणे नसताना त्यांनी केवळ एका आरोपीचा भाऊ म्हणून अविनाश भुसारी यांची भर रस्त्यात हत्या केली. पोलिसांच्या हाती अद्याप एकही पिस्तूल नाही हिरणवार टोळीला महालातील शाहिद अख्तर नावाच्या ऑटोचालकाने तीन पिस्तुले मिळवून दिली होती. १.२७ लाखांत त्याने हे पिस्तूल त्यांना मिळवून दिले होते. काहीही करून प्रवेश गुप्ताला मारायचे व दहशत निर्माण करायची हाच हिरणवार टोळीचा कट होता. त्यांनी २० काडतुसेदेखील मिळविली होती. शाहिदने मध्य प्रदेशातील रिवा येथील गुन्हेगारांकडून ती पिस्तुले मिळविली होती. आरोपींनी एका पिस्तुलातून अविनाश भुसारी यांची हत्या केली व सहा गोळ्या झाडल्या होत्या. काही बुलेट पिस्तुल तपासणीत वापरल्या. मात्र हिरणवार टोळीतील फरार असलेल्या आरोपींकडे अद्यापही दोन पिस्तुले असून त्यांच्याकडे ९ जिवंत काडतुसे आहेत. तसेच तिसरे पिस्तूलदेखील आरोपींनी लपविले असून, तेदेखील पोलिसांना जप्त करता आलेले नाही,

पिस्तुलासाठी आजीचेच चोरले पैसेबंटी हिरणवारला १.२७ लाखांत पिस्तूल मिळणार होते. मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. शिबू यादव हा बंटीच्या आत्याचा मुलगा आहे. त्याने शिबूला पैसे जमवायला सांगितले. शिबूने त्याच्या आजीचे पैसे चोरून ते बंटीला दिले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर