शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याची शेतात नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : मनसर-तुमसर मार्गाच्या कामात कंत्राटदार कंपनीने या राेडलगत आलेली शीतलवाडी-परसाेडा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फाेडली. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : मनसर-तुमसर मार्गाच्या कामात कंत्राटदार कंपनीने या राेडलगत आलेली शीतलवाडी-परसाेडा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फाेडली. ही पाईपलाईन महिनाभरापासून दुरुस्त न केल्याने लगतच्या शेतात व नाल्यात पाणी वाहून जात असल्याने राेज शेकडाे लिटर पाण्याची नासाडी हाेत आहे. आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्यात कंत्राटदार कंपनीकडे वेळ नाही.

मनसर (ता. रामटेक)-तुमसर (जिल्हा भंडारा) या मार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट बारब्रिक कंपनीला दिले आहे. शीतलवाडी-परसाेडा गावाला रामटेक शहरालगतच्या खिंडसी जलाशयातून पाणीपुरवठा केला जात असून, पाणीपुरवठ्याची पाईपलाईन या राेडलगत टाकली आहे. या राेडच्या कामात कंत्राटदार कंपनीने ही पाईपलाईन अनेकदा फाेडली आहे. त्यातच कंपनीच्या कामगारांनी काम करताना ही पाईपलाईन महिनाभरापूर्वी पुन्हा फाेडली. ती तातडीने दुरुस्त करण्यात यावी, यासाठी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगण्यात आले. मात्र, कुणीही याकडे लक्ष दिले नाही, असा आराेप सरपंच मदन सावरकर व उपसरपंच विनाेद सावरकर यांनी केला आहे.

ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदार कंपनी वेळकाढू धाेरण अवलंबत असल्याने राेज शेकडाे लिटर पाणी शेतात व नाल्यात वाहून जात आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता कंपनीने ही पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी सरपंच मदन सावरकर, उपसरपंच विनाेद सावरकर यांच्यासह नागरिकांनी केली असून, कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.