शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आयकर धाडीत घडले नाट्य

By admin | Updated: December 22, 2016 02:46 IST

कोळसा व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागले.

पोलीस आल्यावरच उघडला दरवाजा नागपूर : कोळसा व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागले. इतकेच नव्हे तर या धाडीदरम्यान घडलेल्या नाट्यामुळे आयकर विभाग आणि पोलिसांची चांगलीच फजिती झाली. आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी रात्री १० वाजता रामदासपेठ येथील राजेंद्र अग्रवाल यांच्या बंगल्यावर धडकले. रात्रीची वेळ असल्याने अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही. यादरम्यान अग्रवाल यांचे नातेवाईक आणि मित्रही पोहोचले. त्यांनी आयकर अधिकाऱ्यांना ‘सर्च वॉरंट’ दाखवण्यास सांगितले. आयकर अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने अग्रवाल कुटुंबीयांनीसुद्धा त्यांना प्रतिसाद दिला नाही. दरवाजा उघडत नसल्याने आयकर अधिकाऱ्यांनी सीताबर्डी पोलिसांना बोलावले. यादरम्यान बंगल्याबाहेर बरीच गर्दी झाली. पोलीस आल्यावर अग्रवाल कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. पोलिसांच्या मदतीने आयकर अधिकाऱ्यांनी बंगल्याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आणि आयकर विभागाच्या हाती काहीही सापडले नसल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे दुखावलेल्या अग्रवाल यांच्या मित्रांनी विनाकारण त्यांना त्रास देण्यात आल्याची पोलिसांना तक्रार केली. यावर पोलिसांचे म्हणणे होते की, ते आयकर विभागाच्या बोलावण्यावरच आले. सीताबर्डी पोलिसांनी अग्रवाल यांच्या कुटुंबीयाकडे ‘नील पंचनामा’ सोपविला आणि परत गेले. नोटाबंदीपासून आयकर विभागाचे धाडसत्र वाढले आहे. सातत्याने कारवाई सुरू आहे. सरकारने काळ्या पैशाबाबत ई-मेल आणि इतर दुसऱ्या माध्यमाने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर आयकर विभागांकडे मोठ्या प्रमाणावर माहिती येत आहे. व्यावसायिक वैमनस्यातूनही तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे मंगळवारी घडलेले नाट्य इतर ठिकाणीसुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)