शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांवरही काेराेनाचे संकट; धर्मगुरूंनी स्वीकारला गृह जीवनाकडे परतण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 08:50 IST

Nagpur News काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे.

ठळक मुद्दे अनेक विहारांच्या भिक्खूंसमाेर जीवनयापनाचा प्रश्न

योगेंद्र शंभरकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : समाजात नव्या पिढीला धर्म, संस्कार व कर्तव्याची जाणीव करून देण्यात धर्मगुरूंची भूमिका महत्त्वाची असते. याप्रमाणेच बाैद्ध भिक्खू घर, कुटुंबाचा त्याग करून समाजसेवा आणि धम्म प्रचाराच्या कार्यासाठी विहारात वास्तव्य करतात. मात्र काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे. दुसरीकडे उपासक-उपासिकांचेही विहारात येणेही बंद झाले आहे. अशा परिस्थितीत या भिक्खूंची विचारपूस करणारा कुणी नाही. त्यामुळे भिक्खूंसमाेर जीवन कंठण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे अनेक भिक्खू त्यांच्या घराकडे परतले आहेत तर काही परतण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे.

प्रसंग १ : आराेग्य समस्यांनी वाढविली चिंता

उत्तर नागपुरातील एका माेठ्या बुद्धविहारातील ७२ वर्षीय भन्तेजी काेराेना काळात आपल्या घराकडे परतले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती बिघडली हाेती. या काळात त्यांची देखभाल करणारे कुणी नव्हते. याच चिंतेमुळे ते घरी परतल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रसंग दुसरा : मुलीच्या घरी गेले

याचप्रमाणे नारा रिंग राेडवरील एका विहारातील ७० वर्षीय भदन्त संघपाल यांचेही जीवनयापन करणे कठीण झाले हाेते. त्यामुळे त्यांनाही मुलीच्या घरी परत जावे लागले.

प्रसंग तिसरा : तरुण भिक्खूही परतले

स्थानिकांच्या माहितीनुसार काैशल्यानगर येथील विकारात राहून काही तरुण भदन्त धम्मप्रसार करीत हाेते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना घराकडे परतावे लागले.

काेराेनाने घेतला अनेक भिक्खूंचा बळी

शहरात जवळपास ८०० बुद्धविहार आहेत. यामध्ये बहुतेक वृद्ध भन्ते सेवा करीत आहेत. मात्र त्यांच्या उपचाराचा, औषधांचा खर्च करण्याची जबाबदारी घेणाऱ्या उपासकांची संख्या नगण्य आहे. नुकतेच गिट्टीखदान व सम्यकनगर येथील विहारात राहणाऱ्या काही भिक्खूंचे काेराेनामुळे निधन झाले.

समाजाला पुढे यावे लागेल

ज्येष्ठ भदन्त नागवंश म्हणाले, समाज प्रबाेधन व धर्म प्रचारासाठी प्रत्येक समाजाचे धर्मगुरू, पुराेहित आपला गृहत्याग करून समाजसेवेसाठी कार्य करतात. बाैद्ध भिक्खूंचेही तसेच आहे. या भिक्खूंचे जीवन उपासकांच्या दानावरच अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी थाेडी का हाेईना पण यथाशक्ती मदत करण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस