शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी संपाला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध गुरुवारी कामगार व कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. नागपुरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध गुरुवारी कामगार व कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. नागपुरात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपावर असलेल्या संघटनांनी संप यशस्वी झाल्याचा दावा केला असून जे संपात सहभागी नव्हते त्यांनी मात्र संपाचा फज्जा उडाल्याचा दावा केला आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. आजच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, संपूर्ण जिल्ह्यातील तहसील कार्यालय व पशुसंवर्धन विभाग आदींसह सर्वच विभागातील कर्मचारी संपावर होते. त्यामुळे संपामुळे शासकीय कामकाज प्रभावित राहिले. संप यशस्वी होऊ नये म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचारी मात्र कुठल्याही दबावाला बळी पडले नाही. संविधान चौकात जाहीर सभेला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर धरणे-निदर्शने केली. कुणीही मस्टरवर स्वाक्षरी केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी कास्ट्राईब कर्मचारी कामावर असल्याने संपाचा फज्जा उडाल्याचा दावा केला आहे. इंगळे यांनी म्हटले आहे की, आज २६ नोव्हेंबर हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४९ साली भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतीय राज्यघटना अर्पण केली. २६ नोव्हेंबर १९४९ पासून प्रजासत्ताक राज्य सुरु झाले. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात भारतीय सुपुत्रांना वीरमरण आले. अशा या दिवशी भारताच्या कामगारांनी संप घडवून आणणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या कामगारांना काय मिळाले. भारताचे पंतप्रधान भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करीत असताना या दिवशी संप करणे हे देशद्रोहाचे लक्षण आहे. इतकेच नव्हे तर भारतीय कामगार संघटनांनी कास्ट्राईबला विश्वासात घेतले नाही आणि संप पुकारला. या संपात कास्ट्राईबचे महाराष्ट्रातील ७ लाख कामगार संपावर नव्हते. त्यामुळे संपाचा फज्जा उडाला. ८० टक्के कर्मचारी कामावर होते. मंत्रालय पूर्णपणे उघडे होते. त्यामुळे संप अपयशी ठरला, असे त्यांनी स्पष्ट केले.