शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत मसाल्याचे भाव ‘गरम’!

By admin | Updated: January 5, 2015 00:55 IST

अवकाळी पावसामुळे पिकांना झालेले नुकसान आणि विदेशात मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत जिरे, काळी मिरी, खसखस आणि अन्य मसाल्यांमध्ये तेजी आली आहे.

आणखी वाढीची शक्यता : अवकाळी पावसाने पिकांना नुकसाननागपूर : अवकाळी पावसामुळे पिकांना झालेले नुकसान आणि विदेशात मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत जिरे, काळी मिरी, खसखस आणि अन्य मसाल्यांमध्ये तेजी आली आहे. थंडीत मसाले गरम झाल्याने स्वयंपाकघरातील पक्वान्नांचा स्वाद काहीसा बिघडला आहे. गेल्या १५ दिवसांत जिरे प्रति किलो ५० रुपयांनी वधारले आहे. भाव वाढल्याने स्टॉकिस्ट आणि सट्टेबाज सक्रिय झाले असून पुढेही भाववाढीची शक्यता आहे. सध्या जिऱ्याचा साठा कमी आहे. सध्या आवक गुजरातेतील ऊंझा येथून आहे. निर्यातवाढीचा परिणामगोस्वामी यांनी सांगितले की, विदेशात जिऱ्याचे उत्पादन फारच कमी असल्याने निर्यात सुरू आहे. अशीच स्थिती राहिल्यास भाव प्रति किलो २०० रुपयांवर जाईल. याप्रकारे अन्य मसाल्याचे भावही वाढतील. विलायची प्रति किलो ४० रुपयांनी वधारली आहे. याशिवाय काळी मिरीच्या भावात निरंतर वाढ होत आहे. सरसूमध्ये ८ रुपयांची वाढ होऊन भाव ४० वरून ४८ रुपयांवर गेले आहेत. खसखसच्या भावात थोडीशी तर नारळाचे भाव वाढले आहेत. बाजारात ओव्याचे नवे पीक आले आहे. मेथीचे भावही वधारले आहे. मेथी दाणे प्रति किलो ७५ रुपयांवरून ९० रुपयांवर पोहोचले आहेत. मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी बाजाराचे समीक्षक चंदन गोस्वामी यांनी सांगितले की, गुजरात राज्यातील राजकोट, जामनगर, राजस्थान येथील जोधपूर, किसनगड येथे जिऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षी जिऱ्याला योग्य भाव न मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी अन्य पिकांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ४० टक्के लागवड कमी झाली. तर दुसरीकडे गुजरातमध्ये पावसामुळे जिऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले. स्टॉकिस्ट आणि सट्टेबाजांनी मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने पुढेही तेजी राहण्याची शक्यता आहे. एक महिन्याआधी प्रति किलो ११० रुपये असलेले जिऱ्याचे भाव १६१ रुपयांवर पोहोचले आहेत. प्लस फूड क्वालिटी जिरे १३५ रुपयांवरून १८० रुपयांवर गेले आहेत. आगामी काही दिवसातही ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)