शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने उगवले नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवते व आर्थिक नुकसान हाेते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी धान व साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चारभा येथील कार्यक्रमात बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासायची, हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.

कृषी सहायक संदीप देशमुख यांनी उगवणशक्ती तपासण्याची पद्धती समजावून सांगितली. सुती पोते किंवा चौकोनी कापड किंवा वर्तमानपत्र (एकावर एक पाच वर्तमानपत्र) यापैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे पाण्यात भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरुण ठेवावी. त्यावर विशिष्ट पद्धतीप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बिया ठेवून १०-१० रांगा तयार कराव्या. नंतर सदर पोते/वर्तमानपत्र/सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना आतील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गुंडाळलेले पोते/वर्तमानपत्र/सुती कापड सुतळीने बांधावे. तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही, अशा ठिकाणी सावलीत ते ठेवून त्यावर दिवसातून ३-४ वेळा हलकेसे पाणी शिंपडावे.

तीन ते चार दिवसांनी उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणे मोड आलेले आहेत, यातील सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे, असेही संदीप देशमुख यांनी सांगितले. यावेळी चक्रधर गभणे, कृषी पर्यवेक्षक एस. सातपुते, रवी राठोड, राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, रमेश बरबटे, शंकर पटिये, जागेश्वर गडे, शंकर गडे यांच्यासह स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित होते.

...

पेरणीसाठी किती बियाणे वापरावे?

१०० बियांपैकी किमान ७० बिया सुदृढ व निकाेप उगवल्यास ते बियाणे पेरणीयाेग्य असून, त्याची उगवणशक्ती ७० टक्के असल्याचे ग्राह्य धरावे. किमान ७० ते ८० टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे पेरणीसाठी प्रति एकर ३० किलाे वापरावे. ही उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्रत्येकी एक टक्का उगवणशक्ती कमी याप्रमाणे एकरी अर्धा किलाे बियाणे वाढवावे. अर्थात ६९ टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे एकरी ३०.५ किलाे वापरावे. ६८ टक्के असल्यास ३१ किलाे बियाणे वापरावे. उगवणशक्ती ६० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले.