शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींसाठी घेत आहे

By admin | Updated: March 15, 2015 02:27 IST

काँग्रेसने आदिवासींच्या जमिनीला संरक्षण दिले. जमीनदारांकडे असलेल्या शेकडो एकर जमिनींपैकी काही जमीन भूमिहीन सामान्य माणसाला मिळवून दिले.

नागपूर : काँग्रेसने आदिवासींच्या जमिनीला संरक्षण दिले. जमीनदारांकडे असलेल्या शेकडो एकर जमिनींपैकी काही जमीन भूमिहीन सामान्य माणसाला मिळवून दिले. दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकार मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून उद्योगपतींना देत आहे. तेही शेतकऱ्यांची संमती न घेता. भाजपने या संबंधीचा भूसंपादन कायदा लोकसभेत बहुमताच्या बळावर मंजूर केला. या विरोधात रस्त्यावर उतरून काँग्रेस संघर्ष करेल, असा इशारा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला. एका कार्यक्रमासाठी चव्हाण शनिवारी नागपुरात आले. शहर काँग्रेसतर्फे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, आघाडी सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले होते. यातील शैक्षणिक आरक्षण देता येईल, असे न्यायालयानेही सुचविले होते. मात्र, त्यानंतरही भाजप सरकारने आरक्षण रोखले. काँग्रेस सरकारने घेतलेले निर्णय, केलेले कायदे रद्द करण्याचे काम आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. जम्मू कश्मिरमधील पीडीपी-भाजप सरकार अतिरेक्यांना सोडते आणि केंद्रातील भाजप सरकार आपल्याला यातील काहीच माहीत नाही, असे सांगते. याला काही अर्थ आहे का, असा सवाल करीत सत्तेसाठी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी देशहिताच्या, संरक्षणाच्या गोष्टी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची हेरगिरी करणे सुरू आहे. राजीव गांधी यांच्या संदर्भातही असाच प्रकार करण्यात आला होता. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, काँग्रेसजन निराश होणारे नसून संपूर्ण काँग्रेस भक्कमपणे नेत्यांच्या पाठीशी उभी राहील.(प्रतिनिधी)