शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:18 IST

Manoj Jarange Patil :बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात  जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे.  आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आरक्षणावरुन बबनराव तायवाडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात  जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका ही समाजाची मागणी आहे, असंही तायवाडे म्हणाले. 

शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका

"महाज्योतीला लोकसंख्येनुसार जास्तीत जात निधी द्यायला पाहिजे,युवक आणि सामान्य माणसाचे भले होईल. ओबीसी हॉस्टेल सुरू झाले नाही याचीही चर्चा व्हायला पाहिजे,बिहारमध्ये जशी जनगणना झाली तशीच जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून जातनिहाय जनगणना करण्यासाठी बाध्य करावे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले. 

जरांगे पाटलांवर टीका

"मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांवर बोलत आहेत. जरांगे खालच्या स्तरावर भाषा वापरतात. त्यांची उंची आहे का?, असा सवालही बबनराव तायवाडे यांनी केला. ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात,येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडते हे आम्ही दाखवून देऊ. पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे आणि आता आमची शक्ती दाखवू, असंही तायवाडे म्हणाले. 

कुणबी नोंदीबाबत बोलताना तायवाडे म्हणाले, ५४ लाख किंवा ५७ लाखांचा आकडा सांगत आहेत, यात ५७ लाखात ९५ टक्के नोंदी जरांगे पाटील यांच्या आंदोलन आधीच्या आहेत. सरकारने श्वेत पत्र जाहीर करावे, की जरांगे यांच्या आंदोलनपूर्वी आणि आंदोलन नंतर किती नोंदी झाली,मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होते आहे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले. 

आज सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले , या ट्विटवर बोलताना तायवाडे म्हणाले, महाराष्ट्राला माहीत आहे की ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आम्ही आंदोलने करीत असतो. आमचे सर्व प्रश्न संविधानिक आणि शांततेत पूर्ण केले, आमच्या संघटनेने ४८ जीआर काढले आहेत. सरकारसोबत चर्चा करतो, मुद्दे मांडतो,अमच्याबाबतही कोणी बोलावे, ट्विट करावे, असंही तायवाडे म्हणाले.

टॅग्स :Babanrao Taywadeबबनराव तायवाडेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण