शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वनबलप्रमुखांचा ‘सातसूत्री’ अजेंडा

By admin | Updated: July 4, 2014 01:13 IST

राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए. के. सक्सेना यांनी पदभार स्वीकारताच आपल्या १५ महिन्यांच्या कामकाजाचा ‘रोडमॅप’ तयार केला आहे. त्यामुळे पुढील काळात

इतर विभागाशी समन्वय साधणार : १५ महिन्यांचा ‘रोडमॅप’नागपूर : राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए. के. सक्सेना यांनी पदभार स्वीकारताच आपल्या १५ महिन्यांच्या कामकाजाचा ‘रोडमॅप’ तयार केला आहे. त्यामुळे पुढील काळात वन विभागाची गाडी ‘सुपर फास्ट’ गतीने धावण्याची शक्यता आहे. यासाठी सक्सेना यांनी तयार केलेल्या ‘सातसूत्री’ अजेंड्याची त्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यानुसार सक्सेना यांनी वन विभागातील कार्यप्रणाली हाताळताना व्यक्तिआधारित व्यवस्था न ठेवता, संस्थाआधारित व्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सभा घेणे, वन विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभागाशी समन्वय साधणे, कार्यालयीन क्षमता वाढविण्यासाठी अभिलेख्यांचे वर्गीकरण करणे, जुन्या व निरुपयोगी नस्ती नष्ट करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मूल्यांकन विभागाचे बळकटीकरण व चांगल्या कामांची नोंद घेऊन त्याचे समाजासमोर सादरीकरण करणे, असे प्रमुख निर्णय घेतले आहेत. सेवानिवृत्त वनबलप्रमुख एस. डब्ल्यू. एच. नकवी यांच्या जागी सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी अलीकडेच १ जुलै रोजी या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर ते प्रथमच पत्रकारांशी बोलत होते. सक्सेना पुढे म्हणाले, गत पाच वर्षांत वन विभागात फार मोठा बदल झाला. पूर्वी निधीची फार मोठी समस्या भेडसावत होती. परंतु गत काही वर्षांत ती दूर झाली आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळाली आहे. पुढील १५ महिन्यांच्या काळात खूपकाही करण्याची इच्छा आहे, शिवाय यापूर्वीही अनेक विकास कामे झाली आहेत. गत २०१० ते २०१४ दरम्यान राज्यात १५७२.१४ लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी सहा कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, आतापर्यंत त्यापैकी दोन कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. दुसरीकडे जंगलाशेजारी राहणाऱ्या लोकांचा जंगलावरील भार कमी करण्यासाठी २०१२-१३ मध्ये २८.६१ कोटी रुपयांचा खर्च करून ४१ हजार ६४६ कुटुंबांना एलपीजी व बायोगॅसचे वाटप करण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये ३२ हजार ८६५ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, एपीसीसीएफ व्ही. के. सिन्हा व शेषराव पाटील यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)