शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांची बदल्यांसाठी फरफट!

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

ज्या मंत्रालयातर्फे सात दिवसांत फाईल्सचा निपटारा करण्याचे आदेश जारी होतात, त्याच मंत्रालयात मात्र कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली ...

बदली प्रस्ताव धूळखात : शेकडो अधिकारी, कर्मचारी सहा महिन्यांपासून घरीनागपूर : ज्या मंत्रालयातर्फे सात दिवसांत फाईल्सचा निपटारा करण्याचे आदेश जारी होतात, त्याच मंत्रालयात मात्र कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली प्रस्तावाच्या फाईल्स मागील सहा महिन्यांपासून तुंबून पडल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या या आडमुठेपणामुळे कृषी विभागातील शेकडो अधिकारी/कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. माहिती सूत्रानुसार मागील ३१ मे २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग- २ (कनिष्ठ राजपत्रित) व महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग-२ (राजपत्रित) संवर्गासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी झाले होते. परंतु यापैकी काही अधिकारी/कर्मचाऱ्यांना नवीन पदस्थापनेवर रुजू होणे शक्य झाले नाही, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अंशत: फेरबदलासह पुन्हा शासनाकडे बदली प्रस्ताव पाठविले. शिवाय बदलीस पात्र नसतांना ज्यांना बदली हवी आहेत, अशाही काही लोकांनी आपले विनंती अर्ज शासनाकडे सादर केले. परंतु शासनस्तरावर मागील सहा महिन्यांपासून या सर्व प्रस्तावांवर कोणताही निर्णय घेण्यात आला नसून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची फरफट सुरू आहे. माहिती सूत्रानुसार शेकडो अधिकारी/कर्मचारी नवीन आदेशाच्या प्रतिक्षेत घरी बसले आहेत. या विलंबाचा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. जाणकारांच्या मते, मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचा हा उद्योगच झाला आहे. यात फार मोठे अर्थकारण अडकले असून, बदल्यांच्या नावाखाली अधिकारी/कर्मचाऱ्यांना अनावश्यक वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा परिवार आहेत. त्यांच्यावर मुलाबाळांची जाबाबदारी आहे. मात्र असे असताना मागील सहा महिन्यांपासून सर्व अधिकारी व कर्मचारी विना वेतनाने घरी बसून आहेत. एक अधिकारी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर म्हणाला, सर्वत्र गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, दसरा व दिवाळी साजरी केली जात असताना आमच्या घरी मात्र अंधकारमय वातावरणात होते. सहा महिन्यांपासून वेतनच नसल्याने कोणताही दसरा किंवा दिवाळी साजरी करू शकलो नाही. (प्रतिनिधी)