शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

भूजलवाढीसाठी राज्यात ९२५ कोटींचा प्रकल्प राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 7:00 AM

Water Nagpur News राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे नागपूर, अमरावती, बुलडाण्यासह राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यांमधील १,४४३ गावांची निवड करण्यात आली असून यात विदर्भातील नागपूर, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यावर अध्ययन करून ती आता अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या काळामध्ये ही योजना राबविली जाणार असून यासाठी ९२५ कोटी ७७ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. ही योजना राबविताना अतिशोषित, शोषित, अंशत: शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्याच्या २०१३ मधील भूजल अहवालानुसार अतिशोषित ७४, शोषित ४, अंशत: शोषित असलेली १११ पाणलोट क्षेत्रे आहेत. या सर्व ठिकाणी आगामी पाच वर्षांच्या काळात ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी लोकसहभातून जलसुरक्षा आराखडे तयार केले जाणार आहेत.

या जिल्ह्यात राबविणार योजना

राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाणार असून यात नागपूर, अमरावती, बुलडाणा या विदर्भातील तीन जिल्ह्यांसह जालना, उस्मानाबाद, लातूर, पुणे, सातारा , सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण १८९ पाणलोट क्षेत्रांपैकी १३ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यांमधील ७३ पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या १,३३९ ग्रामपंचायतींमधील १,४४३ गावांची निवड यात करण्यात आली आहे.

अंमलबजावणीसाठी समित्या

योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन राज्यस्तरीय समित्या, तीन जिल्हास्तरीय समित्यांचे गठण केले जाणार आहे. यातून योजनेवर नियंत्रण राखले जाईल.

भूजलसंबंधी माहिती व अहवाल सर्वसामान्य नागरिकांना कळावा यासाठी संकेतस्थळ तयार केले जाईल. यासाठी ७३ कोटींची तरतूद आहे. कार्यक्षम पाणी वापर पद्धतीचा अवलंब करण्यासाठी २९५ कोटींची तरतूद आहे तर, भूजल पातळीच्या दरात सुधारणा करण्यासाठी ११० कोटी रुपयांची तरतूद यात आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

- सूक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर

- मातीमधील आर्द्रता टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर

- पाणी उपलब्धतेनुसार पीक संरचना आदी उपाययोजना प्रस्तावित

- सर्व उपाययोजना व कामे पूर्ण झाल्यावर त्रयस्थ एजन्सीकडून निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीचा अभ्यास

- भूजल पातळीच्या दरात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना

येथे राबविणार योजना

जिल्हा              तालुके          पाणलोट क्षेत्र          ग्रामपंचायती          गावे

नागपूर                   २                  २                              ७६             १२३

अमरावती             ३                    ६                           २१७             २१७

बुलडाणा             १                      ४                           ६८             ६८

पुणे                    ३                       ५                          ११०             ११८

सातारा              ३                         ३                          ११४             ११४

सोलापूर             ४                        ५                         ११५             ११७

नाशिक २             ९                        १                         १६             १२९

अहमदनगर           ३                         ६                        १०१             १०९

जळगाव               ४                           ६              १०१             ११४

जालना                 ३                             ५             ५०             ५०

लातूर                 ४                              ९             १२१             १३६

उस्मानाबाद            २ ७                          ५            ५  ५                ५

...

टॅग्स :Waterपाणी