शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : संघाने दिला संपुर्ण काश्मीरचा नारा

By admin | Updated: October 11, 2016 21:36 IST

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत सरसंघचालक मोहन भागवतांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - 'उरी' येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने गेल्या महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ' सर्जिकल स्ट्राईक' करत ३८ जणांचा खात्मा केला. लष्कराच्या या कारवाईचे कुठे कौतुक होत आहे तर कोणी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. ' केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्करानं जे काम करून दाखवलं ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतोय' अशा शब्दांत कौतुक करत भागवतांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली. 
विजयादशमीच्या मुहुर्तावर नागूपरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन पार पडले. 
 
‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्द्यावरुन काश्मीर प्रश्न आणखी तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड काश्मीरचा नारा दिला आहे. संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्या दरम्यान मोहन भागवत यांनी मीरपूर, मुजफ्फराबाद, गिलगिट, बाल्टिस्तानसह या पाकव्याप्त काश्मीरमधील भागांसह संपूर्ण काश्मीरवर भारताचाच अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले.  मोदी सरकार व सैन्याला शाबासकी देत संपूर्ण काश्मीरच्या भुमिकेवर केंद्र सरकारने आक्रमक भुमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादनदेखील त्यांनी यावेळी केले. संघाच्या नव्या गणवेशातील हा पहिलाच विजयादशमी उत्सव होता हे विशेष.
 
केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्करान जे काम करून दाखवलं ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतोय. भारतीय जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगाच्या पाठीवर भारताची मान उंचावली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूटनितीमुळे पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आले आहे, अशा शब्दांत कौतुक करत सरसंघचालकांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली.  सीमेपलिकडून काश्मिरातील जनतेला फूस लावण्याचे काम केले जाते हे सर्वांनाच माहिती आहे. असे होऊ नये यासाठी तेथे विजयाबरोबरच विश्वासाचेही वातावरण निर्माण करावे लागेल, असे ते म्हणाले.आजचे केंद्रातील व राज्यातील सरकार काम करणार आहे, उदासीन नाही. अजून बरचं काम होण बाकी आहे, पण सध्या जे काम सुरू आहे ते पाहून देश खूप पुढे जाईल असा विश्वास जनतेला वाटतो, असे भागवत म्हणाले.
 
 
सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंत भाई भाडेसिया, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक दिलीप लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
 
देशद्रोही शक्तींना उखडून टाका
यावेळी डॉ.भागवत यांनी सीमा भागात कार्यरत असलेल्या विविध दहशतवादी गटांना संपविण्याससंदर्भात भाष्य केले. देशातील संरक्षण दलाला सीमेवर आणखी दक्ष रहावे लागणार आहे. थोडीशी चूकदेखील महागात पडू शकते. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळी दाखविलेले दृढतेचे धोरण कायम राहिले पाहिजे. सीमा भागात कार्यरत असलेल्या देशद्रोही शक्तींना मूळापासून उखडून टाकावे लागेल. यासाठी केंद्र व राज्य यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे, असा सल्ला सरसंघचालकांनी दिला. 
 
विरोधकांवर हल्लाबोल
‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्यावरुन तसेच वर्षभरातील विविध वादांदरम्यान विरोधी पक्षांनी घेतलेल्या भुमिकेवर सरसंघचालकांनी जोरदार टीका केली. विरोधी पक्षांमुळे लोकशाही मजबूत होते.  भारताला पुढे जाऊ न देणाºया शक्ती घुसखोरी करत असून देशातल्या काही लोकांमुळे त्यांना खतपाणी मिळत आहे. देशातील काही लोक प्रत्येक गोष्टीचे भांडवल करत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. काही लहान गोष्टींना अवास्तव मोठे रुप देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.  देशाच्या हितासमोर पक्षीय राजकारणाला महत्त्व देणे योग्य नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
 
जातीय भेदभावावर टीका
२१ व्या शतकात असूनदेखील देशात होत असलेल्या जातीय भेदभावाच्या घटनांवर सरसंघचालकांनी टीका केली. देशात सामाजिक समरसतेसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. मात्र लहानशा गोष्टीमुळे उत्तेजित होऊन आपल्या श्रेष्ठतेच्या अहंकारात समाजातील निरपराध बांधवांवर अत्याचार करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत रहावे
गोरक्षेच्या मुद्यावरुन देशात मोठा वाद निर्माण झाला होता. गोरक्षा व्हायलाच हवी. मात्र गोरक्षेच्या मुद्द्यावरुन लहानशा मुद्द्याला हवा देऊन अकारण वाद निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे आवश्यक आहे. उत्तेजित होऊन काम करू नये. गोहत्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले. 
 
शिक्षणप्रणाली स्वस्त व्हावी
शिक्षणप्रणालीच्या बाजारीकरणाबाबत डॉ.भागवत यांनी चिंता व्यक्त केली. देशातील शिक्षणप्रणालीत बदल अपेक्षित आहेत. स्वाभिमान, आत्मविश्वास वाढवणारी प्रणाली हवी. शिक्षणप्रणाली स्वतंत्रच रहायला पाहिजे. परंतु त्याचे बाजारीकरण होऊ नये यासाठी त्यात शासनाचा सहभाग हवी. शिक्षण सर्वांना सुलभपणे उपलब्ध झाले पाहिजे. सर्वांना शिक्षण स्वस्त मिळावे, यासाठी शासनाचा पुढाकार हवा, अशी सूचना सरसंघचालकांनी केली.
 
उत्सवांतील धांगडधिग्यांवर ठेवले बोट
समाजप्रबोधन व्हावे व संस्कारांची मूल्ये रुजावीत यासाठी देशात विविध उत्सव साजरे केले जातात. उत्सवांमध्ये ‘डीजे’ वाजविणे व ‘डेकोरेशन’ करणे यामुळे समाजप्रबोधन होत नाही. विधायक उपक्रम राबविले गेले पाहिजेत. महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यान, अनेक मंडळ लोकहिताचे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विस्थापित हिंदूना समान अधिकार हवा
देशात समान अधिकार कायदा लागू करावा, ही संघाची जुनी मागणी आहे. सरसंघचालकांनी त्याचाच पुनरोच्चार केला. काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूंना अद्यापही अधिकार मिळालेले नाहीत. स्वातंत्र्यापासून काश्मीरचे नागरिक असूनदेखील त्यांच्याबाबत भेदभाव करण्यात येत आहे. याला संपविण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन डॉ.भागवत यांनी केले.
 
मुख्यमंत्री, गडकरी संघ गणवेशात
विजयादशमी उत्सवाला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे संघाच्या नवीन गणवेशात उपस्थित झाले होते. दोघेही मंत्री म्हणून नव्हे तर स्वयंसेवक म्हणून आले होते. याशिवाय राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपुरातील भाजपाचे सर्व आमदार, खा.मनोज तिवारी, खा.अजय संचेती, खा.विकास महात्मे, गायिका अनुराधा पौडवाल, विदेशातून आलेले स्वामी ब्रम्हदेव, स्वामी आनंदगिरी, डॉ.टोनी, राजा लुईस हे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नवीन गणवेशाबाबत उत्साह
संघाच्या नवीन गणवेशातील हा पहिलाच विजयादशमी उत्सव होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत पहिल्यांदाच ‘फुलपॅन्ट’मध्ये दिसले. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ज्येष्ठ स्वयंसेवकांपासून ते अगदी बाल स्वयंसेवकांपर्यंत हजारो जण नवीन गणवेशात होते. सरसंघचालकांनीदेखील या गणवेशाकडे सर्वांचे लक्ष असल्याचे भाष्य केले.