शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
4
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
5
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
6
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
7
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
8
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
9
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
10
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
11
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
12
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
13
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
14
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
15
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
16
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
17
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
18
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती
19
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
20
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया

तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 11:21 IST

Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत.

रत्नागिरी/सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात पूरस्थिती दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. (Chiplun Flood) तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्येही पुराने आपली भीषणता दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मदतीसाठी जनतेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. (The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people) 

मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण शहराला पुराने वेढा घातला असताना तेथील पुरात अडकलेले रहिवासी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधत होते.पुरात अडकलेल्या अशाच काही जणांचा अतुल पाटील या तरुणाशी संपर्क झाला असता त्याने थेट मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करत परिस्थितीची माहिती दिली. ''तातडीची मदत पाहिजे.  कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे सावित्री नदीचा प्रवाह भयंकर आहे. तिथे १५ माणसे रात्रीपासून छतावर अडकली आहेत. नदी आणि घर एक आहे अशी स्थिती आहे. हात जोडून विनवणी करतो. लवकरात लवकर मदत पोहोचवा, असे ट्विट या तरुणाने केले या ट्विटची दखल घेत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाली झाल्या. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तिथे अडकलेल्या गर्भवती महिलेसह एकूण १५ जणांची सुटका केली. 

सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील रहिवाशी असलेला अतुल राजाभाऊ पाटील हा तरुण चिपळूण येथे शिक्षणासाठी होता. त्यावेळी चिपळूणमध्ये तो ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता. तेथील रहिवाशी परवा चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे पाण्यात अडकून पडले होते. ते मदतीसाठी मोबाईलवरून याचना करत होते. त्यातील एकाचा संपर्क अतुल पाटील याच्याशी झाला. त्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवले आणि ट्विटरचा वापर करत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आणीबाणीच्या प्रसंगी अतुलने दाखवलेल्या प्रसंगावधाचे आता कौतुक होत आहे.

याबातत प्रतिक्रिया देताना अतुल पाटील याने सांगितले की, चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या काही निटवर्तीयांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विट केले. त्यानंतर मला या बिकट परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा किती सतर्क आहे, याची जाणीव झाली. माझ्या ट्विटची दखल घेऊन पुरात अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचवली गेली. माझे प्रयत्न यशस्वी ठरले याचे समाधान आहे.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरीSolapurसोलापूर