शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
2
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
3
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
4
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
5
Vladimir Putin In India : जग पुतिन यांचं विमान शोधत राहिलं, आकाशात सुरू होता रहस्यमय खेळ, दिल्लीतील लँडिंगनंतर उलगडलं गूढ!
6
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
7
गुजरातच्या वोटर लिस्टमध्ये १७ लाख 'मृत' मतदारांची नावं! SIRने केले मोठे खुलासे
8
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
9
आरबीआयचा रेपो दर ठरवतो तुमचे EMI आणि आर्थिक गणित! कर्ज महाग होणार की स्वस्त? सोप्या भाषेत
10
IndiGo: विमान रद्द झाल्याचं कळवलं नाही, राहण्याचीही सोय नाही; इंडिगोच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक!
11
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
12
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग पीरियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
13
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
14
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
15
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
16
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
17
वय वर्षे १२४! ठाण्याचे मनोरुग्णालय होणार आता ‘मॉडर्न’; ३,२७८ बेडची व्यवस्था, अद्ययावत किचन आणि २४×७ कॅन्टीन सुविधा  
18
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
19
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
20
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
Daily Top 2Weekly Top 5

तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 11:21 IST

Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत.

रत्नागिरी/सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात पूरस्थिती दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. (Chiplun Flood) तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्येही पुराने आपली भीषणता दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मदतीसाठी जनतेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. (The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people) 

मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण शहराला पुराने वेढा घातला असताना तेथील पुरात अडकलेले रहिवासी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधत होते.पुरात अडकलेल्या अशाच काही जणांचा अतुल पाटील या तरुणाशी संपर्क झाला असता त्याने थेट मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करत परिस्थितीची माहिती दिली. ''तातडीची मदत पाहिजे.  कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे सावित्री नदीचा प्रवाह भयंकर आहे. तिथे १५ माणसे रात्रीपासून छतावर अडकली आहेत. नदी आणि घर एक आहे अशी स्थिती आहे. हात जोडून विनवणी करतो. लवकरात लवकर मदत पोहोचवा, असे ट्विट या तरुणाने केले या ट्विटची दखल घेत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाली झाल्या. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तिथे अडकलेल्या गर्भवती महिलेसह एकूण १५ जणांची सुटका केली. 

सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील रहिवाशी असलेला अतुल राजाभाऊ पाटील हा तरुण चिपळूण येथे शिक्षणासाठी होता. त्यावेळी चिपळूणमध्ये तो ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता. तेथील रहिवाशी परवा चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे पाण्यात अडकून पडले होते. ते मदतीसाठी मोबाईलवरून याचना करत होते. त्यातील एकाचा संपर्क अतुल पाटील याच्याशी झाला. त्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवले आणि ट्विटरचा वापर करत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आणीबाणीच्या प्रसंगी अतुलने दाखवलेल्या प्रसंगावधाचे आता कौतुक होत आहे.

याबातत प्रतिक्रिया देताना अतुल पाटील याने सांगितले की, चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या काही निटवर्तीयांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विट केले. त्यानंतर मला या बिकट परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा किती सतर्क आहे, याची जाणीव झाली. माझ्या ट्विटची दखल घेऊन पुरात अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचवली गेली. माझे प्रयत्न यशस्वी ठरले याचे समाधान आहे.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरीSolapurसोलापूर