शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 11:21 IST

Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत.

रत्नागिरी/सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात पूरस्थिती दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. (Chiplun Flood) तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्येही पुराने आपली भीषणता दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मदतीसाठी जनतेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. (The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people) 

मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण शहराला पुराने वेढा घातला असताना तेथील पुरात अडकलेले रहिवासी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधत होते.पुरात अडकलेल्या अशाच काही जणांचा अतुल पाटील या तरुणाशी संपर्क झाला असता त्याने थेट मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करत परिस्थितीची माहिती दिली. ''तातडीची मदत पाहिजे.  कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे सावित्री नदीचा प्रवाह भयंकर आहे. तिथे १५ माणसे रात्रीपासून छतावर अडकली आहेत. नदी आणि घर एक आहे अशी स्थिती आहे. हात जोडून विनवणी करतो. लवकरात लवकर मदत पोहोचवा, असे ट्विट या तरुणाने केले या ट्विटची दखल घेत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाली झाल्या. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तिथे अडकलेल्या गर्भवती महिलेसह एकूण १५ जणांची सुटका केली. 

सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील रहिवाशी असलेला अतुल राजाभाऊ पाटील हा तरुण चिपळूण येथे शिक्षणासाठी होता. त्यावेळी चिपळूणमध्ये तो ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता. तेथील रहिवाशी परवा चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे पाण्यात अडकून पडले होते. ते मदतीसाठी मोबाईलवरून याचना करत होते. त्यातील एकाचा संपर्क अतुल पाटील याच्याशी झाला. त्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवले आणि ट्विटरचा वापर करत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आणीबाणीच्या प्रसंगी अतुलने दाखवलेल्या प्रसंगावधाचे आता कौतुक होत आहे.

याबातत प्रतिक्रिया देताना अतुल पाटील याने सांगितले की, चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या काही निटवर्तीयांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विट केले. त्यानंतर मला या बिकट परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा किती सतर्क आहे, याची जाणीव झाली. माझ्या ट्विटची दखल घेऊन पुरात अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचवली गेली. माझे प्रयत्न यशस्वी ठरले याचे समाधान आहे.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरीSolapurसोलापूर