शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 11:21 IST

Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत.

रत्नागिरी/सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात पूरस्थिती दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. (Chiplun Flood) तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्येही पुराने आपली भीषणता दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मदतीसाठी जनतेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. (The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people) 

मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण शहराला पुराने वेढा घातला असताना तेथील पुरात अडकलेले रहिवासी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधत होते.पुरात अडकलेल्या अशाच काही जणांचा अतुल पाटील या तरुणाशी संपर्क झाला असता त्याने थेट मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करत परिस्थितीची माहिती दिली. ''तातडीची मदत पाहिजे.  कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे सावित्री नदीचा प्रवाह भयंकर आहे. तिथे १५ माणसे रात्रीपासून छतावर अडकली आहेत. नदी आणि घर एक आहे अशी स्थिती आहे. हात जोडून विनवणी करतो. लवकरात लवकर मदत पोहोचवा, असे ट्विट या तरुणाने केले या ट्विटची दखल घेत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाली झाल्या. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तिथे अडकलेल्या गर्भवती महिलेसह एकूण १५ जणांची सुटका केली. 

सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील रहिवाशी असलेला अतुल राजाभाऊ पाटील हा तरुण चिपळूण येथे शिक्षणासाठी होता. त्यावेळी चिपळूणमध्ये तो ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता. तेथील रहिवाशी परवा चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे पाण्यात अडकून पडले होते. ते मदतीसाठी मोबाईलवरून याचना करत होते. त्यातील एकाचा संपर्क अतुल पाटील याच्याशी झाला. त्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवले आणि ट्विटरचा वापर करत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आणीबाणीच्या प्रसंगी अतुलने दाखवलेल्या प्रसंगावधाचे आता कौतुक होत आहे.

याबातत प्रतिक्रिया देताना अतुल पाटील याने सांगितले की, चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या काही निटवर्तीयांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विट केले. त्यानंतर मला या बिकट परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा किती सतर्क आहे, याची जाणीव झाली. माझ्या ट्विटची दखल घेऊन पुरात अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचवली गेली. माझे प्रयत्न यशस्वी ठरले याचे समाधान आहे.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरीSolapurसोलापूर