शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 19:05 IST

उद्धव ठाकरेंनी जुनी विचारधारा सोडली असून नवीन विचारधारा स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश करण्यास त्यांची हरकत नसावी असं विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर -  उद्धव ठाकरेंची विचारधारा राहिली कुठे? ज्या पक्षाचा जन्म काँग्रेसविरोधात झाला. बाळासाहेबांनी जो पक्ष उभा केला तो मुस्लीम समाजाला टार्गेट करण्यासाठी केला होता. दक्षिण भारतीयांना टार्गेट करण्यासाठी केला होता आणि काँग्रेसविरोधात केला होता. आता ज्या उद्देशातून पक्ष स्थापन झाला होता तो आता बाजूला पडला आहे. मुस्लीम समाजही उद्धव ठाकरेंना मतदान करत आहे. कारण तुम्ही जुनी विचारधारा सोडली आणि नवीन विचारधारा स्वीकारली आहे. मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही? असा थेट सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

जलील यांनी शहरात पत्रकार परिषद घेत इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली. इम्तियाज जलील म्हणाले की, इंडिया आघाडीला देशभरात, महाराष्ट्रात मुस्लिमांनी मतदान केले. ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला मतदान झाले. आता त्यांनी लोकसभेला जशी लाट मिळाली तीच विधानसभेला मिळणार असा समज करून घेऊ नये. या २-३ महिन्यात लोकांनी बरेच अनुभव घेतले. विशालगडाचा जो प्रकार झाला ते करणारे कोण, कुठल्या पक्षाचे हे बघितले. मग विधान परिषदेची निवडणूक आली तेव्हा ३० वर्षानंतर मुस्लीममुक्त विधान परिषद करण्यात आलेली आहे. अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे लोकांना आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता असं वाटू लागले असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय वक्फ बोर्डाचा विषय लोकसभेत आला तेव्हा त्यांचे एकही खासदार तिथे उपस्थित नव्हते, विधेयक आणले तेव्हा ते सभागृहातून बाहेर पळाले. तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे आम्ही फक्त दर ५ वर्षांनी तुमच्याकडे मतदान मागायला येणार असं त्यांना वाटते. ५ वर्षात तुमच्यावर काही अन्याय झाला तर आम्ही मूग गिळून गप्प बसणार. कमीत कमी विधेयकावर बोलायला हवं होते. तुमची भूमिका काय हे स्पष्ट करायला हवी होती असा टोला इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, मालेगाव, धुळे, नांदेड, मुंबईतील काही भाग जिथे आमची मजबूत पकड आहे तिथे लढवण्याची तयारी आहे. महाराष्ट्रात काय परिस्थिती हे माहिती आहे. कागदावर ही युती-आघाडी दिसणार आहे पण इतके अपक्ष पक्षाविरोधात जाऊन स्वबळावर लढणार आहेत. आम्ही ३० जागांवर चाचपणी केली आहे. या ३० जागांवर आमचा सर्व्हे सुरू आहे. आघाडीची परिस्थिती काय असेल त्यावर जागा वाढवायच्या कमी करायचा तेव्हा निर्णय होईल असंही जलील यांनी स्पष्ट केले. 

युती, आघाडी केवळ कागदावर  

आता राजकारणात कुठलीही गॅरंटी राहिली नाही. निवडणुकीनंतर शरद पवार मविआसोबत राहतील का, अजित पवार इकडे येतील का, मुख्यमंत्रिपद न मिळाल्यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील हे कुणीही सांगू शकत नाही. ३ पक्ष एकत्र बसले आहेत परंतु तिघांना एकमेकांवर विश्वास नाही. प्रत्येकाने पाठीमागे खंजीर लपवून ठेवला आहे. संधी मिळताच कुणाला मारतील माहिती नाही. निवडणूक आल्यानंतर कुणी कुणाचं ऐकणार नाही असं भाष्य इम्तियाज जलील यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर केले. 

इतके मोठे पक्ष, स्वबळावर लढण्याची हिंमत कुणात नाही 

इतके मोठे पक्ष मग इतर पक्षांच्या कुबड्या का लागतात, भाजपा इतका मोठा पक्ष मग त्यांच्यात हिंमत नाही का एकटं लढायची. एकनाथ शिंदे नको, अजित पवारही नको असं बोलायची. एकनाथ शिंदे इतके आमदार आणले मग एकटं लढण्याची हिंमत का नाही. शरद पवार महाराष्ट्रात इतकी वर्ष राजकारण करतायेत मग का २८८ जागा लढवू शकत नाहीत. ६ पक्ष कागदावर युती आणि आघाडी आहे. निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येकाला जास्त जागा हव्यात. प्रत्येक पक्षाने उमेदवारांना लढण्याचे संकेत दिले आहेत असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.   

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवार