शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डायरीतली दोन पानं...

By admin | Updated: October 10, 2014 23:35 IST

सरकारनामा

आज पप्पू उगाच नको ते बोलला. मतदान पाच-सहा दिवसांवर आलं असताना पत्रकार परिषद घेऊन साहेब आणि त्या इस्लामपूरकरावर आगपाखड केली. या पप्पूला आताच बोलायची काय गरज होती? बोलला दोघांवर, पण अडचणीत येणार सगळेच. त्याला आता पाच वर्षं काही काम नाही. डिप्रेशनमध्ये दिसतोय. लोकसभेला पडल्यापासून त्याचं असं सुरू आहे. आम्ही निवडून येतोय म्हटल्यावर, तर त्याचं फ्रस्ट्रेशन वाढलंय. यावेळी वातावरण चांगलं असताना ‘मला नाही, तुला नाही, घाल तिसऱ्याला’ असं करून डाव विस्कटायला या पप्पूचं काय जातंय? त्याला निवडणुकीत दोन महिने सिमल्याला पाठवून दे, असं विशालला आधीच सांगितलं होतं. ‘प्रतीक, असं करू नकोस, कशाला त्या शेट्टी-फिट्टी गँगच्या नादाला लागलायस?’ असं सांगूनही ऐकत नाही. आधी आपलं बस्तान बसवावं, मग बाकीच्यांच्या मागं लागावं, इतरांचे देव उठवावेत, हे याला कधी कळणार? काय करावं कळत नाही. साहेब आम्हाला ओव्हरटेक करतायत, हे मला दिसत नाही काय? पण ही वेळ नाही ना... पप्पूबाबत साहेबांचा आणि विश्वजितचा मगाशीच फोन येऊन गेला. आता त्याला एखादी नवी स्पोर्टस् कार घेऊन द्यावी का, असं वाटायला लागलंय. कार घेऊन दिल्यावर जाईल लाँग ड्राईव्हवर... नाहीतर बसंल खोलून मॉडीफाय करत... चार दिवस घोर तर राहणार नाही. बघू, उद्या सकाळी ठरवू... सुरेशअण्णाचा फोन का यायला लागलाय?... परवा म्हणत होता, कमळासाठी माझा बळी दिलाय म्हणून... खुळंच दिसतंय... सांगत होतो, ऐकलं नाही त्यावेळेला... बघू काय म्हणतोय...(डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचं फाडलेलं हे पान भाऊंच्या ‘विजय’ बंगल्याच्या काटेरी कुंपणात अडकलं होतं... एकच पान सापडल्यानं पुढचा मजकूर काही कळला नाही. काही ठिकाणी फुल्या मारल्या होत्या. तेथे बहुदा कोणते शब्द वापरायचे हे ठरले नसेल. काही ठिकाणी खाडाखोडही दिसत होती. उद्या मानसिक आरोग्य दिन असल्याची तळटीप मात्र ठळक करण्यात आली होती. )-(आणि हे दुसऱ्या डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचंच पान. अर्थात फाडून टाकलेलं नसलं तरी व्हॉटस् अ‍ॅपवरून सगळीकडं फिरत असलेलं...)  आज सकाळी सुधीर, सुरेंद्रदादा यांच्यामार्फत साहित्य पाठवलंय. घोरपडे सरकारांनी तंगी असल्याचं रात्री सांगितलं होतं. त्यांना पक्षाकडनं मटेरियल आलं तरी ते पुरेना म्हणे! मोदी येऊन गेल्यावर उलट आबालाच सहानुभूती मिळत असल्याचं काका म्हणत होते. तसंच दिसतंय. त्यामुळं सरकारांनी हात पसरलाय वाटतं. मागच्या लोकसभेची बाकी अजून राहिलीय, त्याचं काय? तरी बरं, अमरबापूनं अजून काही मागितलं नाही! दुपारी जगतापसाहेबांनी जतच्या मटण लोणच्याचा डबा पाठवला होता. झणझणीत होतं. जिभेच्या बाभळी गेल्या. गुळमुळीत बोलून-बोलून अजीर्ण झालं होतं. त्या दिवशी गडकरींनी कामेरीत येताना नागपूरवरून आणलेलं सावजीचं मटण आणि वडाभातही बेस्ट होता.मानसिंगभाऊला सांगितलंय, शेवटच्या चार दिवसांत धुरळा पाड म्हणून. महाडिक कंपनीचं काहीतरी बघितलं पाहिजे. देशमुखांकडनं निरोप आलाय, शिवाय घरातली कुरकूर आहेच, त्यामुळं भाऊकडं (सत्यजित नव्हे मानसिंग) नीट लक्ष देता येईना. देशमुखांविरोधात स्टेजवरूनही बोलता येत नाही. पण मानसिंगभाऊची आणि आटपाडीची सीट काढायचं घोंगडं मोठ्या साहेबांनी गळ्यात अडकवलंय. सांगलीत आमचा लोच्या झालाय, असं सुरेशअण्णा म्हणतायत म्हणे! अजितदादाकडंनं तिकीट आणतात काय? मलाही तेच पाहिजे होतं. कुणाचा ‘कार्यक्रम’ करायचाय, हे अण्णांना आधीच सांगितलं होतं. पण ऐकायला नको? बजाज कंपनी, भालचंद्र, दिग्विजयला ते माहीत आहे, म्हणून बरं. त्यांनी सगळ्यांना निरोप पोहोचलाय की नाही, ते उद्या तपासायला पाहिजे. सोमवारनंतर फिरवाफिरवी करायला लागेल. कदमसाहेबांची आणि माझी भेट झाल्याच्या कालच्या व्हॉटस् अ‍ॅपवरच्या मेसेजनंतर प्रतीक बिथरला आणि त्यानं प्रेसपुढं दंगा केला. आम्ही होनमोरेला पळवल्यापासून आणि जितेंदरनं दगा दिल्यापासून त्याची गडबड सुरू झालीय. आपल्याला हवं तसं घडतंय. दादा फॅमिलीत भांडणं लागलीच पाहिजेत. कदमसाहेबांना रात्री बारानंतर फोन करायचाय. पावणेबारा झालेत. चला, लिहायचं थांबवून बाहेर पडू... बरीच कामं बाकी आहेत.शूऽऽऽ हे कुणाच्या डायरीतलं पान आहे, हे ओळखलंच असेल!)- श्रीनिवास नागे