शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पुरावा दिलेला नसताना शिक्षा झाली - खडसे

By admin | Updated: July 3, 2016 17:01 IST

काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते. आपल्यावर आरोप होत असताना आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ : काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते. आपल्यावर आरोप होत असताना आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. कुणी पुरावेही दिलेनाही.त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात व्यक्त केली.जिल्हा बँक सभागृहात रविवारी दुपारी १२ वाजता हा मेळावा झाला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना-भाजपा यांच्यात सुरु असलेला वाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच एकत्र आल्याने सभागृहात व त्यानंतर जिल्ह्यात चर्चेचा विषय होता. विशेष म्हणजे या तीनही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली नाही. खडेस व महाजन जवळ बसले होते व एकमेकांशी अधूनमधून संवाद साधत होते. या दोन्ही नेत्यांच्या हालचालींवर उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या. तुमच्या सारखाच मी सुद्धा घरी बसलो आहेखडसे म्हणाले, जो काम करतो तोच चुकतो. शासकीय नोकरी करीत असताना आरोप झाले तर तुम्हाला उत्तर तरी देता येते. मात्र पुरावे न देता आमच्यावर आरोप झाले. आरोपाचे उत्तरही आम्हाला देता येत नाही. त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्यावरील आरोपांना कुणी पुरावा दिला तर किमान समाधान तरी मिळेल. कुणी जमीन घेतली म्हणतो. कुणी जावायाने लिमोझिन कार घेतल्याचा आरोप करतो. जे काही आरोप असतील त्याचे पुरावे देण्याचे आव्हान आपण दिले आहे. मात्र ते देखील कुणी स्वीकारत नाही. त्यामुळेच तुमच्यासारखाच नाथाभाऊ घरी बसला असल्याचे सांगितल्यानंतर सभागृहात हास्याचे फवारे उडाले.दोन भाऊ सक्षम.. तिसऱ्या भाऊने बोलणे योग्य नाहीआमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रामसेवक आणि तलाठी हे पिशवीत संपूर्ण गाव घेऊन फिरत असल्याचे सांगितले. ग्रामसेवकांचे प्रश्न मांडण्यासाठी आज व्यासपीठावर नाथाभाऊ, गिरीशभाऊ उपस्थित आहेत. दोन भाऊ सक्षम आहेत. ते शासनस्तरावर निर्णय घेतील. त्यामुळे या ठिकाणी तिसऱ्या भाऊने (गुलाबभाऊ) जास्त बोलणे उचित नाही. ग्रामसेवकांच्या अडचणी मांडण्याचे काम मी करेल. सोडविण्याचे काम दोन्ही भाऊ करतील असे सांगितल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.