शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

शिवसेना-भाजप स्थानिक पातळीवरही होतायत विभक्त ? औरंगाबादेतून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 12:56 PM

शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मित्रपक्ष मिळाले आहे. त्यामुळे भाजपने साथ सोडली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता टिकवणे त्यांना अवघड जाणार नाही. तर विरोधात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेची फळं चाखता येणार आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणूक सोबत लढवून सत्तास्थापनेच्या वेळी विभक्त होणाऱ्या भाजप आणि शिवसेनेतील वितुष्ट आता चांगलेच वाढले आहे. त्यातच जनता प्रश्न विचारत असल्याचे सांगत स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत असलेल्या युत्या तोडण्याचा निर्णय भाजपने घेतला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबादेत भाजपने महापालिकेत शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेऊन याला सुरुवात केली आहे. भाजपने राज्यात आपला प्रतिस्पर्धी फक्त शिवसेनाच असं निश्चित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत युती करून लढलेल्या शिवसेना-भाजपला जनतेने बहुमत दिले होते. यामध्ये भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. त्यामुळे युतीचं सरकार येणार हे स्पष्ट होते. तसेच सर्व आमदारांनी जनतेला याच आधारावर मतं मागितली होती. मात्र भाजपने मुख्यमंत्रीपदासंदर्भात नरमाईची भूमिका न घेतल्याने युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ मिळवत सरकार स्थापन केले.

भाजपच्या स्थानिक पातळीवरील प्रतिनिधींना यामुळे अडचण होण्यास सुरुवात झाली आहे. जनता प्रश्न विचारत असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेसोबत असलेल्या युत्या तोडण्याच्या तयारीत भाजप दिसत आहे. याला औरंगाबादमध्ये सुरुवात तर झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबाद महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत. भाजपचा उपमहापौर असून उपमहापौरांनी राजीनामा देत सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषदा, नगर पालिका, महानगरपालिकेत उभय पक्ष एकत्र सत्तेत आहे. मात्र राज्यातील बदलेल्या समिकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप विभक्त होणार असं दिसत आहे.

दरम्यान शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मित्रपक्ष मिळाले आहे. त्यामुळे भाजपने साथ सोडली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता टिकवणे त्यांना अवघड जाणार नाही. तर विरोधात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेची फळं चाखता येणार आहे.