शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सू.गवई यांचे निधन

By admin | Updated: July 25, 2015 17:27 IST

ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने आज नागपूरमध्ये निधन झाले.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. २५ -  ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी नागपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्रातील दलित चळवळीचे एक अग्रणी नेते असलेल्या गवई यांनी बिहार व केरळचे माजी राज्यपालपद भूषवले. त्यांचा जन्म १९२९ साली अमरावतीत झाला. गवई यांनी दलितांच्या प्रश्नासाठी सतत आवाज उठवला. दलित चळवळीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांचे महत्वाचे स्थान होते. 

गवई यांचा जीवनपट : 

रामकृष्ण सूर्यभान गवई - जन्म ३० ऑक्टोबर १९२९

जन्मस्थळ : दारापुर जिल्हा अमरावती
 
शैक्षणक पात्रता: नागपुर विद्यापीठ (महाराष्ट् )चे पदवीधर
 
भूषवलेली पदे
सभासद महाराष्ट्र विधान परिषद्
 
उपाध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद - १९६८-७८
 
अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद १९७८-८२
 
कॉमनवेल्थ पर्लमेंटरी असोसिएशन महाराष्ट् शाखेचे सयुक्त उपाध्यक्ष
 
१२ डिसेबर १९८६ ते डिसेंबर १९८८ विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद्
 
१९९८-९९ सदस बारावी लोकसभा
 
एप्रिल २००० राज्यसभेवर निवडून आले
 
मिळालेले सन्मान
 
कुष्ठरोगिकरिता बहुमूल्य मदत व सहाय्य याबद्दल मिळालेले कुष्ठमित्र अवार्ड आणि कुष्ठरोगियांचा मित्र अवार्ड
 
प्रियदर्शनी ग्रुप ,मुंबई यांचे माध्यमातून समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य तसेच अस्पृश्यता निर्मूलन आणि कुष्ठरोग या क्षेत्रात केलेल्या प्रशसनीय कार्यबद्दल पुरस्कार
 
डॉ बाबासाहेब अम्बेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ईश्वरी देवी अॅवार्ड
 
इतर माहिती
विद्यार्थी दशेपासून सामजिक व राजकिय चळवळीत सक्रीय सहभाग ,महाराष्ट्र विधान परिषदचे अखंड तिस वर्ष सभासदत्व (२६जुले १९९४) रोजी निवृत्त )महाराष्ट्र राज्यात एम्प्लॉयमेंट गारंटी स्कीम सुरु व्हावी यeकरिता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाइक आणि महाराष्ट्र विधान परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष श्री व्ही एस पागे याच्या सहकार्यातून पायाभूत काम केले 
 
अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,उपाध्यक्ष जागतिक बौद्ध फेलोशिप(सेन्ट्रल जनरल कौंसिल ऑफ़  जागतिक बौद्ध फेलोशिप यांच्या बैंकॉक येथील सभेत एकमताने निवड) त्यांच्या संस्थेत 1998 मध्ये पुन्हा निवड 
 
दादासाहेबानी आपल्या दलित बांधवांच्या उद्घारासाठी भरीव कामगिरी तर केलिच त्याचबरोबर जातिभेद ,धर्मभेद वा पंथभेद पाळुन स्वजातियाना सवलती देऊन इतराणा दूर ढकलन्याचा आपपभाव कधीच दाखवला नाही .
भूतपूर्व चेयमन ,धार्मिक आणि भाषिक उपसमिति अल्पसंख्यांकविषय महाराष्ट्र राज्य
 
अमरावती येथे1989 साली भरलेल्या ६२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
 
अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दीक्षाभूमि नागपुर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती
 
नियुक्ति डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि व्याख्याने महाराष्ट्र विषयक महाराष्ट्र राज्य समितीचे उपाध्यक्ष
 
मुंबई व अन्यत्र झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शांतता आणि सादभाव निर्माण करण्याकरिता स्थापन झालेल्या राज्य शांतता समितीचे सभासद
 
२२ जून २००६ पासून १० जुलै २००८ पर्यन्त बिहारचे राज्यपाल
 
१० जुले २००८ ते ७ सप्टेंबर २०११ केरळ चे राज्यपाल
 
मृत्यू --.  २५ जुलै २०१५