शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तच्या रजांची चौकशी

By admin | Updated: December 27, 2014 04:31 IST

१९९३च्या मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटांच्या काळात घातक शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला वारंवार रजा कशी दिली जाते

मुंबई : १९९३च्या मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटांच्या काळात घातक शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला वारंवार रजा कशी दिली जाते, याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणी पुण्याच्या तुरुंग उप महानिरीक्षकांना चौकशी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.शिंदे म्हणाले की, संजय दत्तसोबत शिक्षा भोगत असलेल्या इतर चार-पाच कैद्यांनीही फर्लो रजेसाठी अर्ज केले होते, पण एकट्या संजय दत्तला १४ दिवसांची रजा मंजूर केली गेली, अशी माहिती मला मिळाली आहे. ही सवलत दत्त याला कोणत्या नियमानुसार दिली गेली व इतरांना का नाकारली गेली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.१४ दिवसांच्या फर्लो रजेवर संजय दत्त बुधवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगातून विशेष विमानाने घरी परतला. पत्नी मान्यता हिच्या आजारपणाच्या कारणावरून याआधी त्याला गेल्या वर्षी आॅक्टोबर व डिसेंबरमध्ये प्रत्येकी २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी मान्यता एका चित्रपटाच्या प्रीमियरला व एका सेलेब्रिटी पार्टीला हजर राहिल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने तिच्या आजारपणाविषयी व त्याआधारे संजय दत्तने दिलेल्या रजेच्या कारणाच्या खरेपणाबद्दल संशय व्यक्तकेला गेला होता. एवढेच नव्हे तर संजय दत्तला शिक्षेत झुकते माप दिल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी त्यावेळी येरवाडा कारागृहाबाहेर उग्र निदर्शनेही केली होती. याविषयी उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल झाली असून न्यायालयाने सरकारला खुलासा करण्यास सांगितले आहे.संजय दत्तला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली असून आधी व आता मिळून त्यापैकी त्याची सुमारे निम्मी शिक्षा भोगून झाली आहे. (विशेष प्र्रतिनिधी)