शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

खासदार जलील यांच्यापर्यंत आमच्या वेदना पोहोचवाव्यात; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 12:40 PM

शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले एमआयएम पक्षाचे एकमेव आमदार इम्तियाज जलील हरवले असल्याचे निवेदन नुकतेच औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मतदारसंघात नागरी समस्या असताना जलील नेमके कुठे हरवले ? त्यांचा शोध लावण्याचे अनोखे पत्र वैजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रियाजोद्दीन शेख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जलील यांची मोठ्याप्रमाणावर चर्चा झाली होती. त्यातच त्यांनी संसदेत मराठीत शपथ घेतल्याने त्यांचे अनेकांनी कौतुक सुद्धा केले. परंतु निवडून आल्यापासून जलील यांनी औरंगाबाद शहर सोडले तर मतदारसंघातील ग्रामीण भागात पाठ फिरवली असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे वैजापूर येथील समाजिक कार्यकर्ते यांनी जलील हरवले असल्याचे निवदेन प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्याचे खासदार पद भूषवताना जलील यांना ग्रामीण परिसराचा पूर्णपणे विसर पडला आहे. काही दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करत आहे. मात्र असे असताना सुद्धा खासदार जलील कुठेच दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हरवलेल्या खासदार जलील यांची प्रशाकीय बैठकीदरम्यान भेट झाल्यास त्यांना आमच्या अडचणीचे पत्र पोचविण्यासाठीची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद