शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे घोटाळे अन् पापं काढण्याची तंबी

By admin | Updated: March 9, 2015 02:19 IST

काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत केलेली पापं आम्हाला फेडावी लागत असल्याचा पलटवार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत केलेली पापं आम्हाला फेडावी लागत असल्याचा पलटवार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या काळात झालेले घोटाळे बाहेर काढण्याची तंबी देत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘चर्चेतून मार्ग निघतो’, असा सल्ला आम्हाला गेली १५ वर्षे देणाऱ्या आघाडीने आज भूमिका बदलून आपल्या चहापानावर बहिष्कार टाकला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. या पार्श्वभूमीवर, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याला तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचे फडणवीस सरकारने ठरविले असल्याचे स्पष्ट झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या रात्री झालेल्या बैठकीतही भाजपा-शिवसेनेने विरोधकांचे टीकास्र सर्व ताकदीनिशी परतविण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मुस्लिम आरक्षणाबाबत आमच्या सरकारला जाब विचारणाऱ्या आघाडीच्या सत्ताकाळात मुस्लिम समाजाच्या हक्काच्या असलेल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी कोणी कोणी बळकावल्या याची माहिती चौकशी अहवालातून राज्यातील जनतेसमोर याच अधिवेशनात आम्ही आणू. तेव्हा मुस्लिमांचे कैवारी कोण हे कळेलच, असा दमही मुख्यमंत्र्यांनी दिला. दमणगंगा खोऱ्यातील पाणी आमचे सरकार गुजरातला द्यायला निघाले असल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा आहे. या बाबत आघाडी सरकारने कोणता करार केला होता आणि त्यांनी गुजरातला दिलेले पाणी आम्ही कसे परत आणले याचा पत्रव्यवहारच राज्यासमोर मांडण्याचीआपली तयारी आहे, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)