शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

नववी, अकरावीतील विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्षात- वर्षा गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:38 IST

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच होणार

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने अखेर पहिली ते आठवीप्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती म्हणजे परीक्षेविना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या, मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू हाेते. नववी व अकरावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे त्यांच्या पुढील दहावी व बारावीच्या वर्गांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र काेरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अंतर्गत मूल्यमापन कसे करणार? मार्गदर्शक सूचना असतील यासंबंधी परिपत्रक एससीईआरटी येत्या २ ते ३ दिवसांत काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल.काेरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते. यामुळे अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. तसेच नववीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात राज्यातील विविध विभागांकडून माहिती घेऊन वर्गोन्नती देताना त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल. त्यासाठी मार्गदर्शक सूचना एससीईआरटीकडून जारी करण्यात येईल. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.ऑफलाइन परीक्षा ही ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणीराज्यातील अनेक शाळांमध्ये व खेड्यापाड्यात संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांकडे केली. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांची संधी प्रत्येकाला मिळावी या हेतूने परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडcorona virusकोरोना वायरस बातम्या