शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:53 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: महाविकास आघाडीसह मनसेने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. पण समोरून काही उत्तर आले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

NCP SP Group MP Supriya Sule News: महाविकास आघाडीसह मनसे पक्षाने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. मात्र आमच्या पदरात काहीच पडले नाही. समोरून काही उत्तर आले नाही. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा खुलासा केला. मात्र, निवडणूक आयोग यावर काहीच बोलायला तयार नाही.  निवडणूक आयोगावर दबाव असण्याची शक्यता आहे. दुबार मतदानाचे पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नाही. कोणत्याही चौकशी विना क्लिनचीट दिली जाते. याचा अर्थ या सर्वाचे निवडणूक आयोग समर्थन करत आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला. आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार त्याला आम्ही प्राधान्य देऊ. पुढे स्थानिक नेते त्यांच्या फिडबॅक काय येतो. त्याप्रमाणे नियोजन करून पुढच्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारला ७ वर्षे घाई झाली नाही

खरेतर ही निवडणूक घेण्यात काही अर्थ नाही. कारण दुर्देव आहे की, एका सशक्त लोकशाहीचा ज्याचा सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे, तिथे मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ होतो, तो दुरूस्त करा. तंत्रज्ञान एवढे बदलले आहे की, ते आपले आयुष्य चांगले आणि सोपे करते. त्यामुळे महिना, पंधरा दिवसात, दोन महिन्यात मतदार याद्यांमधील घोळ नीट करून जानेवारीमध्ये निवडणुका घेता येऊ शकत होत्या. काहीच घाई नव्हती. एवढी घाई का झाली. या महाराष्ट्र सरकारला ७ वर्षे घाई झाली नाही. एकदम असे काय झाले जितकी आरोपाला धार वाढत गेली तेवढी निवडणुकीची घाई झाली, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केली.

स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून स्वबळाचा नारा 

आम्ही जरी विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतीसाठी एक विशेष सेशन बोलवा. चर्चा करू. महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या. जसे ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो तशी महाराष्ट्राला आता गरज आहे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही आघाडी म्हणून लढणार आहे. स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून स्वबळाचा नारा देण्यात येईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत, महाराष्ट्र प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीतून चालला आहे. हा केंद्र सरकारचा डेटा आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यासारख्या शहरात भरदिवसा काल क्रूर पद्धतीने हत्या झाली. हे पहिलेच प्रकरण नाही. मग पुण्याच्या कायदे सुव्यवस्थेवर कधी चर्चा होणार? महाराष्ट्रात गुन्हेगारी, गरिबी, बेरोजगारी आणि महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांची दर तीन तासाला एक आत्महत्या होते, हा मकरंद आबा पाटलांचा डेटा आहे, जो त्यांनी विधानसभेत मांडला आहे. मग ही परिस्थिती असेल तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार का नाही बोलत आहे? असा संतप्त सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Why the Election Rush Now After 7 Years Delay?: Supriya Sule

Web Summary : Supriya Sule criticizes the Election Commission for ignoring voter fraud evidence. She questions the urgency for elections now, suggesting voter list errors be fixed first. Sule also urged the government to address Maharashtra's economic and social issues.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी