शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, आतापर्यंत जनजागृती ७६ लाखांची 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 5:16 AM

CoronaVirus News : जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता.

मुंबई : कोविड काळात १५ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत मुंबईत जनजागृती करण्यात आली. या अभियानाकरिता प्रसारभारतीसह इतर खासगी रेडिओ वाहिन्यांवरून जिंगल्स स्वरूपात संदेश देण्यात आला होता. या मोहिमेसाठी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मुंबईत आरोग्य विभाग व स्वयंसेवकांचे पथक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी व जनजागृती करीत होते. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मुंबईकरांना जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक होते. यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर, वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा स्वीकार करण्यास सामान्य जनमानसात व्यापक स्वरूपात जनजागृती होणे आवश्यक होते. यासाठी ही मोहीम १५ सप्टेंबरपासून राबवण्यात आली.

आरोग्यविषयक शिक्षण देणे हे मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्यविषयक शिक्षण देणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे जिंगल्स संदेश २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत प्रसारित करण्यासाठी एकूण ३३ लाख ५१ हजार रुपये एवढे खर्च करण्यात आले, तर १५ ते २४ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत याच खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे ४३ लाख ३३ हजार रुपये याप्रमाणे ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस