शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा धमाका होणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:56 IST

सरकारने मराठा समाजाची फसवणूक करू नये, आंदोलन बदनाम केले जातंय असा आरोप करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर टीका केली

छत्रपती संभाजीनगर -  मी धनगर, ओबीसी बांधवांना विरोधक मानलं नाही. कधी आयुष्यात मानणार नाही. कुणी काय करायचे हे लोकांना माहिती आहे. लोक हुशार झालेत. पुढचा धमाका होणार आहे. १३ तारखेपर्यंत गप्प आहे. मराठा समाजाला सरकारने फसवू नये असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगेसोयरेची अंमलबजावणी आमच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे. १३ तारखेपर्यंत मी काही बोलणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अंतरवाली सराटी येथे जाऊन बसणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. ६ जुलैपासून मराठा समाज जनजागृती रॅली जिल्ह्याजिल्ह्यात निघणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठ्यांचे सरकार मग मराठा पोरांवर अन्याय का? आमच्या जातीचे इतके हाल का? माझ्या शब्दाचा काहीजण गैरसमज निर्माण करतायेत. मी २०-२२ वर्षापासून लढा देतोय. प्रत्येक क्षण समाजासाठी दिला आहे. समाजाला आणि आंदोलनाला खाली मान घालावी लागेल असं कुणी बोलू नका. विचारपूर्वक बोला. आंदोलनाला कोट्यवधी मराठ्यांचा हातभार आहे. समाजात गैरसमज पसरवू नका असं आवाहन टीका करणाऱ्या मराठा समाजातील नेत्यांना जरांगेंनी केले आहे.

दरम्यान, मराठ्यांचे नेते आता फोन करतायेत, आम्ही सोबत आहोत. सगळ्या पक्षातील ओबीसी नेता एकवटला, मराठा समाज पाठिशी पण मराठा नेते एकटवले नाहीत.  मला घाण घाण बोलणारे आहेत. समाजासाठी बोलणं ऐकायला काय फरक पडतो, माझा अपमान झाला, जातीसाठी पचवला. आजही माझ्यावर अनेक संकटे आहेत. समाज एकाबाजूला राहिला तरी आम्ही आरक्षण घेऊ. मी एकटा जरी राहिलो तरी लढणार असं मनोज जरांगे म्हणाले. 

सरकार आम्हाला फसवू शकत नाही, आम्ही आधीच डाव ओळखलाय

आमच्या म्हणण्याप्रमाणे सगेसोयरे व्याख्या घ्यायची. सरकारने खोट्या बातम्या पसरवू नये. सगेसोयरेबाबत आम्हाला फसवलं तरी ३ मागण्या आहेतच. मराठा आणि कुणबी एकच आहे हा एका ओळीचा जीआर काढायचा. आमच्या मागण्या वाढल्या नाहीत त्याच आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, दौड संस्थान, बॉम्बे गर्व्हमेंट गॅझेट लागू करा, विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. आम्ही ३-४ मागण्या त्याचसाठी ठेवल्या, सरकारने एका मागणीत फसवलं तर इतर २-३ मागण्या आहेत. आम्ही जातिवंत मराठे आहोत. त्यामुळे तुम्ही फसवू शकत नाही. आम्ही तुमचा डाव आधीच ओळखला होता. अचानक मागणी करत नाही. पहिल्यापासून आमच्या मागण्या आहेत असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती