शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर

By यदू जोशी | Updated: September 20, 2019 04:57 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भाजपाची भूमिका

यदु जोशी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्याने आणि त्याचवेळी लहान मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याने शिवसेनेच्या वाट्याला उर्वरित १२० जागा येतात. शिवसेना त्यासाठी राजी होत नसल्याने युतीच्या मार्गात बाधा निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने शिवसेनेसमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावात असे नमूद करण्यात आले की गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा काही जागा जादा यावेळी जिंकणे आवश्यक आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाला गेल्यावेळच्या यशाचीही पुनरावृत्ती करता आली नाही असे चित्र निकालात समोर आले तर ते पक्षाची मानहानी करणारे असेल.
कोणताही पक्ष लोकप्रियतेच्या कितीही शिखरावर असला तरी त्याच्या यशाचे प्रमाण हे ८० टक्के इतके असते याकडे भाजपने शिवसेनेचे लक्ष वेधले असून त्यामुळेच किमान १२२ जागा जिंकायच्या तर १५० जागा लढाव्या लागतील असा तर्क दिला आहे. भाजपकडून शिवसेनेला हेही सांगितले जात आहे की २०१४ मध्ये शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. आता त्यांनी १२० जागा लढविल्या आणि युतीची लाट असल्याचे लक्षात घेता ८० टक्के जागा जिंकल्या तरी त्यांचे ९५ आमदार निवडून येऊ शकतात.
शिवसेनेचे त्यापेक्षा दहा जागा कमी आल्या तरी त्यांचे ८५ आमदार निवडून येतील. ही संख्या त्यांच्या मागील संख्याबळापेक्षा २२ ने जास्त असेल. भाजपला गेल्यावेळचे संख्याबळ टिकवून जादा दहा जागा जास्त जिंकायच्या तरी १५० पेक्षा कमी जागा लढवून चालणार नाही.
शिवसेनेने १२० जागा लढविल्या तरी स्वत:कडील ६३ जागांव्यतिरिक्त ५७ जागा त्यांना लढायला मिळतात. जेव्हा की भाजपने १५० जागा लढल्या तर त्यांना स्वत:कडील १२२ जागांव्यतिरिक्त केवळ २८ जादा जागा लढायला मिळतात. त्यातही सहा विद्यमान आमदार आणि
काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांची संख्या १४ इतकी आहे. ती गृहित धरल्यास नव्या केवळ १४ जागा लढण्याचा वाव भाजपला असेल.
>मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनीतीची प्रतीक्षा
युती करताना भाजपचा असा कोंडमारा होत असल्याने आणि त्याचवेळी शिवसेना १२० जागांवर समाधान मानण्यास तयार नसल्याने युतीचे घोडे अडले आहे. मात्र, महाजनादेश यात्रेवरून परतलेले मुख्यमंत्री चाणक्यनीती वापरून तोडगा काढतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे