शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Eknath Shinde: कहानी में ट्विस्ट; 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'ची होती चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:27 IST

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; अमृता फडणवीस यांनीआधीच दिले होते संकेत?

Eknath Shinde Devendra Fadnavis CM: शिवसेना, महाविकास आघाडी विरूद्ध बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा पहिला अध्याय मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे संपला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत आले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून राज्यपालांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक भक्कम सरकार देण्यात येईल अशी जोरदार चर्चा काल रंगली होती. राजभवनात शपथविधीची वेळ ठरली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अशी शपथ घेतील असेही ठरल्याचे सांगितले जात होते. पण फडणवीस-शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीसांनी वेगळीच घोषणा केली व साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली २०१४ ते २०१९ या दरम्यान महाराष्ट्रातील सरकार चालवण्यात आले. २०१९ साली महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीतील बंडखोर अजित पवार यांनी सत्तास्थापनेचा दावा करत शपथ घेतली. पण त्यानंतर दीड दिवसांत हे सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. या सरकारमध्ये कोंडी होणाऱ्या काही बंडखोरांनी बंड केले. त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असे बोलले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा खेळच पलटवला.

अमृता फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे दिले होते संकेत?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या दोन-अडीच वर्षांत राजकीय विषयांवर मत मांडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर अमृता फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसल्या. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावरही अमृता फडणवीस यांनी टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांचे बंड सुरू झाल्यावरही त्यांनी बरीच वेळा टीका केली. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे संकेत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणेच दिले होते अशीही चर्चा आहे. अमृता फडणवीस या देशाबाहेर काही कामानिमित्त गेल्या होत्या. राज्यात सत्तेची उलथापालथ सुरू असताना फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशी चर्चा रंगल्यानंतरही अमृता फडणवीस या देशाबाहेरच होत्या. अमृता यांचा राजकारणातील एकंदर रस पाहता फडणवीस मुख्यमंत्री होणार असते तर अमृता फडणवीस या लगबगीने भारतात आल्या असत्या. पण त्या भारतात परतल्या नाहीत, यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते का? अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी