शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Eknath Shinde: कहानी में ट्विस्ट; 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'ची होती चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:27 IST

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; अमृता फडणवीस यांनीआधीच दिले होते संकेत?

Eknath Shinde Devendra Fadnavis CM: शिवसेना, महाविकास आघाडी विरूद्ध बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा पहिला अध्याय मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे संपला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत आले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून राज्यपालांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक भक्कम सरकार देण्यात येईल अशी जोरदार चर्चा काल रंगली होती. राजभवनात शपथविधीची वेळ ठरली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अशी शपथ घेतील असेही ठरल्याचे सांगितले जात होते. पण फडणवीस-शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीसांनी वेगळीच घोषणा केली व साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली २०१४ ते २०१९ या दरम्यान महाराष्ट्रातील सरकार चालवण्यात आले. २०१९ साली महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीतील बंडखोर अजित पवार यांनी सत्तास्थापनेचा दावा करत शपथ घेतली. पण त्यानंतर दीड दिवसांत हे सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. या सरकारमध्ये कोंडी होणाऱ्या काही बंडखोरांनी बंड केले. त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असे बोलले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा खेळच पलटवला.

अमृता फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे दिले होते संकेत?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या दोन-अडीच वर्षांत राजकीय विषयांवर मत मांडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर अमृता फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसल्या. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावरही अमृता फडणवीस यांनी टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांचे बंड सुरू झाल्यावरही त्यांनी बरीच वेळा टीका केली. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे संकेत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणेच दिले होते अशीही चर्चा आहे. अमृता फडणवीस या देशाबाहेर काही कामानिमित्त गेल्या होत्या. राज्यात सत्तेची उलथापालथ सुरू असताना फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशी चर्चा रंगल्यानंतरही अमृता फडणवीस या देशाबाहेरच होत्या. अमृता यांचा राजकारणातील एकंदर रस पाहता फडणवीस मुख्यमंत्री होणार असते तर अमृता फडणवीस या लगबगीने भारतात आल्या असत्या. पण त्या भारतात परतल्या नाहीत, यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते का? अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी