शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:04 AM

शिवसेना-काँग्रेससाठी ७० पैसे; भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये भाव

- जमीर काझी मुंबई : गेल्या चार आठवड्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता कायम असल्याने, राज्यात कोण सरकार स्थापन करणार आणि केव्हा अस्तित्वात येणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सट्टेबाजार मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची एकत्रित महाशिवआघाडी अस्तित्वात येईल, याबाबत ठाम आहेत. सट्टेबाजारात मंगळवारी महाशिवआघाडीसाठी एक रुपयाला ७० पैसे तर भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये दर लावण्यात आला.गेल्या महिन्यात निकाल जाहीर झाल्यापासून सट्टेबाजारात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल, हा बुकींचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत गेला आहे. आता नवीन सरकार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या फार्म्युल्यावर अडून बसल्याने भाजपाला सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करता आली नाही, तर सेना व काँग्रेस आघाडीकडून अद्याप बहुमत असल्याचे दाखविलेले नाही. त्यामुळे आठवड्याभरापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. सेना व कॉँग्रेस आघाडीही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असली, तरी पक्षश्रेष्ठींकडून अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही.आघाडीच्या नेत्यांनी केवळ चर्चेचे गुन्हाळ चालू ठेवले आहे. तर १०५ जागा जिंकलेल्या भाजपने आपल्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा केला आहे. महाराष्ट्रातील या घडामोडीवर सध्याचा सट्टेबाजारही रंगला आहे. निकालानंतरचा पहिला आठवडा वगळता बुक्कींनी भाजप सरकारऐवजी महाशिवआघाडीला पसंती दिली आहे. येथील राजकीय सत्तानाट्याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे त्यावर मुंबईसह अहमदाबाद, सूरत, बंगळुरू आणि दिल्लीतही सट्टा लावला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.येणाऱ्या काळात सत्तेचे गुुऱ्हाळ ज्याप्रमाणे चालू राहील त्याप्रमाणे दर कमी- जास्त होणार आहेत. पण सध्या मात्र महाशिवआघाडीलाच पसंती असल्याचे दिसून येते आहे.शिवसेना आक्रमक झाल्यानंतर बदलले गणितविधानसभेचे निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाल्यानंतर पहिले २, ३ दिवस महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल, या शक्यतेने त्यासाठी एक रुपयाला ४० पैसे इतका दर होता, तर कॉँग्रेस आघाडीसाठी एक रुपयाला ९ रुपये इतका भाव बुकींकडून दिला जात होता. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर आक्रमक झाल्यानंतर त्यांचे भाव कमी होत गेले. मात्र, भाजप सरकारसाठी जादा भाव दिला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस