शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 12:30 PM

Guru Shukra Asta Vivah Muhurat: गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह विवाह संस्कारासाठी महत्त्वाचे मानले जातात, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

Guru Shukra Asta Vivah Muhurat: भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये विविध गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात शुभ मुहुर्तावर करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे असल्याचे पाहायला मिळते. अगदी घरातून निघण्यापासून ते विविध प्रकारचे विधी, होम-हवन, विवाह, विशेष पूजा अनेकविध गोष्टींसाठी मुहूर्त पाहिले जातात. सोने-चांदी खरेदीसाठीही मुहूर्त पाहिले जातात. भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे विवाह करताना विशेषत्वाने मुहूर्त पाहिले जातात. केवळ मुहूर्त नाही, तर विवाह करताना ग्रहबळही पाहिले जाते, असे म्हणतात. नवग्रहांमध्ये गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह महत्त्वाचे मानले गेले असून, मे महिन्यात हे दोन्ही ग्रह अस्तंगत असणार आहेत. त्यामुळे विवाहासाठी आता जुलैमध्ये विवाहासाठी काही मुहूर्त असून, त्यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात मुहूर्त असतील, असे सांगितले जात आहे. 

एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशांवर असतो, तेव्हा तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. पृथ्वीवरून हा ग्रह दिसत नसल्याने या स्थितीला तो ग्रह अस्त पावला, असे समजले जाते. सूर्यापासून दूरच्या अंतरावरून ग्रह मार्गक्रमण करू लागला की, तो ग्रह पृथ्वीवरून दिसतो. त्यामुळे त्या ग्रहाचा उदय झाला, असे सांगितले जाते. विद्यमान स्थितीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरु तसेच शुक्र ग्रह आहेत. त्यामुळे गुरु आणि शुक्र अस्तंगत आहेत. हे दोन्ही ग्रह अस्तंगत असल्यामुळे विवाह, उपनयन संस्कार, गृहप्रवेश तसेच अन्य मंगल कार्यासाठी मुहूर्त नसल्याचे सांगितले जात आहे.

अक्षय्य तृतीया विशेष महत्त्वाचा दिवस

संपूर्ण वर्षात काही दिवस असे असतात की, त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास विशेष मुहूर्त पाहावे लागत नाही. तो दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यास उत्तम मानला जातो. अक्षय्य तृतीया हा असाच एक दिवस आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे हा दिवस शुभ कार्ये करण्यास चांगला मानला जातो. काही ज्योतिषांच्या मते, या दिवशी विविध प्रकारची शुभ कार्ये केली जाऊ शकतात. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त पुण्यफलदायी मानला गेला आहे. या दिवशी केलेले पुण्य अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. 

गुरु-शुक्र कधी होणार उदय? 

मे महिन्यात अस्तंगत असलेले गुरु आणि शुक्र ग्रहांचा अनुक्रमे ३ जून आणि ७ जुलै रोजी उदय होणार आहेत. त्यामुळे ७ जुलैनंतर विवाहासाठी शुभ मुहूर्त असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तुम्ही विवाह करण्याचे ठरवत असल्यास संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. वर आणि वधुची जन्मपत्रिका, ग्रहबळ आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टी पाहून मगच त्या दोघांसाठी कोणता मुहूर्त विवाहासाठी अत्यंत शुभ ठरू शकेल, याचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करू शकतात. जुलै महिन्यात ९, ११, १२, १४ आणि १५ या तारखा विवाहासाठी योग्य ठरू शकतात, असे काहींचे म्हणणे आहे. त्यानंतर १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून, चातुर्मास सुरू होत आहे. १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी देवउठनी कार्तिकी एकदाशी आहे. अनेक ठिकाणी चातुर्मासात शुभ कार्ये केली जात नाहीत.

गुरु-शुक्राचे विवाह संस्कारातील महत्त्व

गुरु ग्रह सुखकारक मानला गेला असून, शुक्र ग्रह हा पतीकारक मानला जातो. विवाहानंतर दोघांचा संसार कसा होऊ शकेल, या गोष्टी गुरुवरून पाहिल्या जातात. तर शुक्रावरून पती-पत्नीमधील नाते कसे असू शकेल, असे पाहिले जाते.  त्यामुळे हे दोन्ही ग्रह सुस्थितीत असणे महत्त्वाचे मानले गेले आहे. गुरु आणि शुक्र हे शुभ ग्रह मानले जातात. चांगल्या वैवाहिक जीवनासाठी गुरु-शुक्र कारक ग्रह मानले गेले आहेत.  

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाmarriageलग्नPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिष