शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 10:30 AM

Loksabha Election - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पीओकेवरील विधानावर पलटवार करताना फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

श्रीनगर -Farooq abdullah on Pakistan ( Marathi News ) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे संवाद, कारण कुठल्याही हिंसक कृत्याचे पडसाद जम्मू काश्मीरच्या लोकांवर होतील. पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत असं विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हे म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांनी पीओके भारताच्या ताब्यात घेऊ असं वक्तव्य केले होते. त्यावर फारूख अब्दुल्ला म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांना असं करण्यापासून कुणी रोखणारं नाही. त्यांनी तसं करू द्या, त्यांना रोखणार कोण? तसेही ते आम्हाला विचारत नाहीत. परंतु लक्षात ठेवा, पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत. दुर्दैव हेच असेल की ते अणुबॉम्ब आमच्यावर डागतील असं त्यांनी सांगितले.

तसेच युद्धाशिवाय एक पर्याय आहे तो म्हणजे चर्चा, संवाद...केंद्र सरकार चीनसोबत १९ वेळा चर्चा करू शकते. चीननं आपल्या हजारो एकर जमिनीवर कब्जा केला आहे. चीन भारतासमोर झुकत नाही. तो सातत्याने पुढे सरकत आहे. मग केंद्र सरकार पाकिस्तानशी संवाद का करू शकत नाही जेणेकरून येथील रक्तपात थांबेल आणि आम्ही शांतीने राहू शकू असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.

दरम्यान, आपले सैनिक दरदिवशी शहीद होतात पण केंद्र गप्प राहते. अनंतनागच्या राजौरी लोकसभा मतदारसंघात शनिवारी जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय वायू सेनेच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात १ जवान शहीद झाला तर ४ जखमी आहेत. दहशतवाद आहे की नाही यावर अमित शाह यांनी उत्तर दिले पाहिजे. दहशतवादासाठी कलम ३७० जबाबदार धरलं जात होते, आता ते कलम हटवलं तरीही दहशतवाद आहे की नाही हे गृहमंत्र्यांनी सांगावे असा टोलाही फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला लगावला.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jammu and kashmir lok sabha election 2024जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल २०२४